HW News Marathi
राजकारण

अयोध्या वारीसाठी सेनेला मनसे शुभेच्छा !

मुंबई | यंदाच्या दसरा मेळाव्यात शिवतीर्थावरुन भाषण करताना २५ नोव्हेंबरला अयोध्येत जावून मोदिंना राम मंदीर बांधणीबाबत प्रश्न विचारणार असल्याचे शिवसेना पक्ष अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यानंतर मनसेने सेनाभवनासमोर आज पोस्टरबाजी केल्याचे पहायला मिळाले आहे. अयोध्येला वारीसाठी शुभेच्छा, देत राज्यातील काही गंभीर प्रश्नाबाबत काय? असे पोस्टर शिवसेना भवनसमोर लावण्यात आले आहे.

मनसेने शिवसेनेला विचारलेले प्रश्न

महाराष्ट्राचे रस्ते खड्डे मुक्त होणार का?

महागाई कमी होणार का?

महाराष्ट्रात महिला सुरक्षित राहणार का?

बेरोजगारांना रोजगार मिळणार का?

शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार का?

शेती मालाला हमी भाव मिळणार का?

महाराष्ट्रातला दुष्काळ संपणार का?

मोकळ्या जागांवरील अतिक्रमण थांबणार का?

महापालिकेतील भ्रष्टाचार संपणार का?

खिशातले राजीनामे बाहेर पडणार का?

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशात भाजपसोबत मुकाबला करण्यासाठी कोणताही राष्ट्रीय पक्ष शिल्लक राहिलेला नाही! – जे. पी. नड्डा

Aprna

राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त व चिंतामुक्त करणार !

News Desk

‘वर्षा’ निवासस्थानी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुकेश अंबानींची भेट; राज्यात चर्चेला उधाण

Aprna