HW News Marathi
राजकारण

पंतप्रधान मोदींनी संसदेचे देखील महत्त्व कमी केले !

नवी दिल्ली | पंतप्रधान मोदी हे ब्लफमास्टरच आहेत. गेली पाच वर्षे मोदी सरकार केवळ सातत्याने खोटे बोलणे, बढाया मारणे आणि विरोधकांना धमकावणे हेच काम करीत आली आहे, अशी टीका यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी यांनी बुधवारी (१३ फेब्रुवारी) केली. “पंतप्रधान मोदींनी संसदेचे देखील महत्त्व कमी केले. ते महत्त्वाच्या विषयांवरील चर्चेदरम्यान संसदेत हजरच राहिले नाहीत. असे यापूर्वी कधीही पाहायला मिळाले नव्हते”, असेही सोनिया गांधी यावेळी म्हणाल्या. त्या काँग्रेस खासदारांच्या बैठकीत बोलत होत्या.

“मोदी सरकार हे संपूर्णपणे हुकूमशाही पद्धतीने वागत आहे. पाच वर्षे पूर्ण होत आली तरी या सरकारने आपली आश्वासने पूर्ण केलेली नाहीत”, असे सोनिया गांधी यांनी यावेळी म्हणाल्या. यावेळी सोनिया गांधी यांनी रोजगार प्रश्न, सामाजिक सलोखा, राफेल विमान खरेदी करार या मुद्द्यांचा देखील उल्लेख केला. “नोटाबंदी हा मोदी सरकारचा सर्वात घोटाळा होता. जीएसटीची चुकीच्या पद्धतीने केलेल्या अंमलबजावणीमुळे अनेक उद्योग व व्यवसाय तळाला गेले. तरीही मोदी सरकार या निर्णयांना आपले यश मानतात”, असे सोनिया गांधी म्हणाल्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Bhima Koregaon : जाणून घ्या…भीमा-कोरेगावचे महत्त्व लोकांना कधी कळले ?

News Desk

आंदोलक शेतकऱ्यांशी तातडीने चर्चा करुन सरकारने प्रश्न सोडवावेत! – अजित पवार

Aprna

“भगवान आणि गाय या दोघांना सोडले तर केंद्र सरकारने सर्वांवर GST लावला,” सुप्रिया सुळेंचा टोला

Aprna