HW News Marathi
राजकारण

पंतप्रधान मोदी देशासाठी नव्हे तर निवडक उद्योजकांसाठी काम करतात !

नवी दिल्ली | आगामी लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराची सुरुवात आज (१२ मार्च) काँग्रेसने गुजरातपासून केली आहे. यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर सडकून टीका केली आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशासाठी नव्हे तर निवडक उद्योजकांसाठी काम करतात”, असा गंभीर आरोप यावेळी राहुल गांधी यांनी केला आहे. देशात मोदी सरकारच्या काळात प्रथमच सर्वोच्च न्यायालयाच्या ४ न्यायाधीशांना पत्रकार परिषद घेऊन आपल्या कामावर असलेल्या दबावाबाबत सांगावे लागणे ही अत्यंत मोठी शोकांतिका आहे”, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

“पंतप्रधान मोदी ना शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली ना बेरोजगारीचा प्रश्न सोडवला. २०१४ साली नरेंद्र मोदी म्हणाले कि मला पंतप्रधान बनवू नका मी देशाचा चौकीदार म्हणून काम करणार आहे. मात्र, या पाच वर्षांमध्ये “चौकीदार चोर है” हेच सिद्ध झाले. भारतीय वायू दलाचे कौतुक करणाऱ्या पंतप्रधान मोदींनी वायुदलाच्याच खिशातून ३० हजार कोटी काढून आपले उद्योजक मित्र अनिल अंबानी यांना फायदा करून दिला आहे. परंतु, ही गोष्ट ते मान्य करत नाहीत”, असे राहुल गांधी यांनी यावेळी म्हटले आहे.

“नोटबंदी हा देखील मोदी सरकारच्या अपयशी ठरलेल्या निर्णयांपैकी एक असल्याचे राहुल गांधी यांनी यावेळी म्हटले आहे. नोटबंदी आणि जीएसटीमुळे छोट्या व्यापाऱ्यांचे प्रचंड हाल झाले. नोटाबंदीच्या वेळी बँकेच्या लांबलचक रांगेत सामान्य माणूस उभा होता. त्या रांगेत अंबानी उभे होते का ?” असा प्रश्न राहूल गांधी यांनी यावेळी उपस्थित लोकांना विचारला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवारांवर हल्ला करणारा इसम अखेर अटकेत

News Desk

दुष्काळ उपाययोजनांसाठी केंद्राकडे ७ हजार कोटीची मागणी

News Desk

#LokSabhaElections2019 : ‘बेरोजगार हार्दिक पटेल’, भाजपच्या प्रचार मोहिमेची उडविली खिल्ली

News Desk