HW News Marathi
राजकारण

राफेल करारात चाराण्याचा देखील घोटाळा झालेला नाही !

नवी दिल्ली | गेल्या अनेक दिवसांपासून देशात राफेल करार प्रकरण चांगलेच गाजत आहे. “राफेल विमान खरेदी कराराबाबत काँग्रेस पक्ष आमच्यावर खोटे आरोप लावत असून. राफेल करारात चाराण्याचा देखील घोटाळा झालेला नाही”, असा दावा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केला आहे. “संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत काँग्रेसने केलेल्या सर्व आरोप खोटे असल्याचे सिद्ध केले आहे” असेही शाह यावेळी म्हणाले.

“आम्ही भारतमातेच्या सुरक्षिततेला प्राथमिक महत्त्व देतो. त्यानंतर निवडणुकांचा प्रश्न येतो. देशाच्या जनतेला जबरदस्तीचे सरकार नको असून जनतेला मोदींच्या नेतृत्त्वाखालील एक सक्षम आणि मजबूत सरकार हवे आहे”, असेही अमित शाह यावेळी म्हणाले. “देशात एका पाठोपाठ एक घोटाळे करणारा काँग्रेस पक्ष आज आमच्यावर आरोप लावत आहे. मात्र, जनतेला सर्व काही माहित आहे. ती काँग्रेसच्या बोलण्यात येणार नाही”, असा टोलाही अमित शाह यांनी यावेळी लगावला आहे.

दरम्यान, राफेल विमान खरेदी प्रक्रियेत कोणतीही अनियमितता नसल्याचे स्पष्ट करत केंद्र सरकार खरेदी करत असलेल्या १२६ विमान खरेदी प्रक्रियेत न्यायालय हस्तक्षेप करू शकत नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते. राफेल करारा संदर्भात प्रत्येक लहान लहान गोष्टींची पडताळणी करणे न्यायालयाला शक्य नाही, असेही सर्वोच्च न्यायालायने स्पष्ट केले होते. या राफेल कराराबाबत आपली भूमिका संपूर्ण देशासमोर मांडण्यासाठी भाजपकडून देशभरात तब्बल ७० पत्रकार परिषदा घेण्यात येणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सरकार ‘ऐतिहासिक’ शब्द वापरते तेव्हा हमखास फसवणूक होते !

Gauri Tilekar

संभाजीनगर नव्हे ‘छत्रपती संभाजीनगर’; औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामकरणास शिंदेंची मान्यता

Manasi Devkar

“काही लोकं ‘ढळली’ पण खरी ‘अढळ’ लोकं माझ्यासोबत कायम”, उद्धव ठाकरेंचा शिवाजीराव आढळराव पाटलांना टोला

Aprna