HW News Marathi
राजकारण

पंतप्रधान मोदी बिनकामाचे, राहुल गांधींची बोचरी टीका

नवी दिल्ली | “काँग्रेसने भारताच्या विकासाची गाथा रचली. परंतु नरेंद्र मोदींनी नोटबंदी आणि गब्बर सिंह टॅक्स आणून त्याला पूर्णपणे उद्ध्वस्त केले. पंतप्रधान मोदी हे बिनकामाचे व्यक्ती आहेत जे कुणाचेही ऐकत नाहीत”, अशी टीका करत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करून पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले आहे.

“काँग्रेसने देशाच्या विकासासाठी प्रयत्न केले. मात्र पंतप्रधान मोदींनी नोटबंदी आणि जीएसटी आणून देशाला उद्ध्वस्त केले”, असे ट्विट पंतप्रधान मोदींनी केले आहे. येत्या काळात मोदी सरकारचे सर्वात मोठे निर्णय मानले जाणारे नोटाबंदी आणि जीएसटी हे त्यांचे सर्वात मोठे अपयश म्हणून समोर येईल. या मागची नेमकी कारण सांगणारी एका इंग्रजी वृत्तपत्राची बातमी आपल्या ट्विटर हँडलवरून शेअर करत राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

संभाजी भिडेंनी महिलांसंदर्भात केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावर अमृता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या…

Aprna

बेळगाव दौऱ्यासंदर्भात शंभूराज देसाई यांची पत्रकार परिषद; म्हणाले…

Aprna

आम्हाला चर्चा नको…आधी मदत जाहीर करा ! 

News Desk
महाराष्ट्र

मराठी पत्रकार दिन | बाळशास्त्री गंगाधरशास्त्री जांभेकर मराठी भाषेतील आद्य पत्रकार

News Desk

6 जानेवारी या दिवशी महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. 1832 साली याच दिवशी बाळशास्त्री जांभेकर यांनी ‘दर्पण’ वृत्तपत्राला सुरुवात केली होती

हे मराठी भाषेतील आद्य पत्रकार होते. दर्पण हे मराठीतले पहिले वृत्तपत्र त्यांनी जानेवारी ६, इ.स. १८३२ रोजी सुरू केले.

इ.स. १८२५ साली त्यांचे मुंबईमध्ये आगमन झाले. मुंबईस येऊन ते सदाशिव काशीनाथ ऊर्फ ‘बापू छत्रे’ आणि बापूशास्त्री शुक्ल यांजकडे अनुक्रमे इंग्रजी व संस्कृत शिकू लागले.गणित आणि शास्त्र या विषयांत त्यांनी प्रावीण्य मिळविले.बाळशास्त्रींना मराठी, संस्कृत, बंगाली, गुजराती, कानडी, तेलुगू, फारसी, फ्रेंच, लॅटिन व ग्रीक या भाषांचे ज्ञान होते. फ्रेंच भाषेतील नैपुण्याबद्दल फ्रान्सच्या राजाकडून त्यांचा मानसन्मान झाला होता.

मुंबईतल्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये शिकवताना, समाजात वावरताना बाळशास्त्रींना अनेक समस्या अस्वस्थ करीत. त्यांना जाणवले की, केवळ महाविद्यालयात शिकवून उपयोग नाही; तर संपूर्ण समाजालाच धडे दिले पाहिजेत समाजाचे प्रबोधन करण्यासाठी वृत्तपत्र काढावे, असे त्यांना वाटू लागले.आपले सहयोगी गोविंद कुंटे आणि भाऊ महाजनांच्या मदतीने त्यांनी दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र काढले.

वृत्तपत्राची भाषा मराठी ठेवण्यात आली असली तरी ब्रिटिश शासनापर्यंत आपला आवाज जावा या हेतूने, वृत्तपत्राचा एक स्तंभ इंग्लिश भाषेत असायचा दर्पण वृत्तपत्रासोबत मराठीतले पहिले मासिक ‘दिग्दर्शन’ त्यांनी इ.स. १८४० साली सुरू केले.‘दिग्दर्शन’ मधून ते भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, व्याकरण, गणित तसेच भूगोल व इतिहासावर लेख प्रकाशित करत.आचार्य अत्रे यांनी त्यांना ‘राष्ट्रजागृतीचे अग्रदूत’ म्हटले आहे.

६ जानेवारी, इ.स. १८३२ रोजी दर्पण वृत्तपत्राच्या पहिला अंक प्रकाशित झाला, तसेच योगायोगाने ६ जानेवारी हा जांभेकरांचा जन्मदिवसही असल्यामुळे हा दिवस दर वर्षी महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा होतो.

Related posts

गेल्या ६ महिन्यात माझ्यावर १० अग्रलेख, मला इतकं महत्व राऊत का देतायत?

News Desk

…तर बाळासाहेब ठाकरे वरून राऊतांच्या एक थोबाडीत मारतील!

News Desk

आजचा कृषिदिन हा शेतकऱ्यांसाठी काळा दिवस – संजय राऊत

News Desk