HW News Marathi
राजकारण

अमेठीच्या पराभवाला घाबरून राहुल गांधी पळाले वायनाडला !

नवी दिल्ली | “अमेठीच्या पराभवाला घाबरून राहुल गांधी वायनाडला पळाले आहेत. कारण त्यांना माहित आहे कि आता त्यांचा टिकाव लागू शकणार नाही”, असा टोला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी लगावला आहे. आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये राहुल गांधी हे २ मतदारसंघातून लढणार आहेत. उत्तर प्रदेशमधील अमेठीसह केरळमधील वायनाड मतदारसंघातून राहुल गांधी आगामी लोकसभा निवडणूक लढविणार असल्याची अधिकृत माहिती रविवारी (३१ मार्च) काँग्रेसकडून देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर अमित शाह बोलत होते.

“राहुल गांधी यांना अमेठीसह आणखी दुसऱ्या मतदारसंघातून लढावे लागत आहे. राहुल गांधी हे अमेठीतील पराभवाला घाबरुन वायनाडमध्ये पळाले आहेत. कारण, ते जाणतात कि आता अमेठीतून त्यांचा हिशोब चुकता केला जाणार आहे”, असे अमित शाह यावेळी म्हणाले आहेत. त्याचप्रमाणे राहुल आणि काँग्रेसने राजकीय फायद्यासाठी धर्माचे गलिच्छ राजकारण केल्याचा आरोप देखील अमित शाह यांनी केला आहे. “हिंदू दहशतवादी असू शकत नाहीत. मात्र, काँग्रेसने आपल्या राजकीय फायद्यासाठी हिंदू धर्माला दहशतवादाशी जोडत हिंदूंना बदनाम केले. या प्रकरणी राहुल गांधींनी माफी मागावी”, अशी मागणीही अमित शाह यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अमित शहा, उद्धव ठाकरे यांची भेट घेणार ?

News Desk

कोरेगाव-भीमा प्रकरण एनआयएकडे म्हणजे काही गोष्टी लपवायच्या आहेत !

News Desk

राम मंदिर हा कोणत्याही एकाच पक्षाचा पेटंट मुद्दा नाही !

News Desk