HW News Marathi
राजकारण

 राहुल गांधी यांना जम्मू-काश्मीरमध्ये ‘नो एन्ट्री’

नवी दिल्ली | कलम ३७० हटवल्यानंर पहिल्यादांच काँग्रेस नेते राहुल गांधी हे शनिवारी (२४ ऑगस्ट) जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर आहे. राहुल गांधी यांच्यासोबत विरोधी पक्षातील ९ नेतेही असणार आहे. राहुल गांधी काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जाणार आहे. परंतु राहुल यांना विरोधी पक्ष नेत्यांसह श्रीनगर विमानतळावरच रोखण्यात आले आणि तेथूनच परत दिल्लीला पाठवण्यात आले. सुरक्षेच्या कारणास्तव राहुल गांधी आणि त्यांच्यासोबत आलेल्या विरोधी पक्ष नेत्यांच्या शिष्टमंडळाला माघारी पाठवण्यात आले.

काश्मीर प्रशासनाकडून या नेत्‍यांना बाहेर जाण्‍याची परवानगी नाकारण्यात आली. यामुळे सर्व नेते सुरक्षा रक्षकांसोबत व्‍हीआयपी लाउंजमध्‍ये बसून होते. यावेळी राहुल गांधी यांच्‍यासोबत गुलाम नबी आझाद, सीपीआयचे नेते डी. राजा, शरद यादव, आनंद शर्मा यांच्‍यासह काही दिग्गज नेते जम्मू-काश्मीरच्‍या दौर्‍यावर होते. प्रशासनकडून पहिल्‍यांदाच हा दौरा रद्द करण्‍याचे सांगण्यात आले होते. केंद्र सरकारने काश्मीरला विशेष दर्जा बहाल करणारे कलम ३७० हटवण्याचा निर्णय घेतल्यानंतरचा राहुल गांधी यांचा हा पहिलाच दौरा होता.

केंद्राने कलम ३७० हटवण्याचा निर्णय घेतल्यानंतर काश्मीर खोऱ्यात हिंसाचाराच्या घटना घडत असल्याचे विधान राहुल गांधी यांनी केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याकडे लक्ष द्यावे, असा उल्लेखही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये केला होता. त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी राहुल गांधींना काश्मीर दौऱ्यावर येण्याबाबत निमंत्रण दिले. राहुल यांनी पहिल्यांदा काश्मीरमध्ये येऊन आढावा घ्यावा, त्यानंतर भाष्य करावे. काश्मीर दौऱ्यावर येण्यासाठी त्यांना विमान पाठवतो, असा टोमणा सत्यपाल मलिक यांनी राहुल गांधीना लगावला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधान मोदींचे मानसिक स्वास्थ्य बिघडले आहे !

News Desk

अरुण जेटली यांनी स्वतःच राफेल कराराच्या किंमती सांगितल्या !

News Desk

मी सदैव लोकांबरोबर अन् लोकांसाठी कार्यरत राहीन !

News Desk