HW News Marathi
राजकारण

मोदींना मी झोपू देणार नाही !

नवी दिल्ली | “पंतप्रधान नरेंद्र मोदी जोपर्यंत देशातील शेतकऱ्यांचे कर्जमाफी करत नाही, तोपर्यंत त्यांना मी झोपू देणार नाही, ” असा इशारा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिला आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विरोधकांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे देखील राहुल म्हणाले आहेत. पुढे असे देखील म्हटले की, आतापर्यंत पंतप्रधानांनी शेतकऱ्यांचे एक ही रुपयाचे कर्जही माफ केलेले नसल्याची माहिती राहुल संसदेच्या कामाकाजमध्ये सहभागी होताना प्रसार माध्यमांशी बोलत होते.

राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काल काँग्रेस नेत्यांचे मुख्यमंत्रीपदाचे शपथविधी संपन्न झाले. यानंतर अवघ्या काही तासातच मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये अवघ्या काही तासांमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली. यावरुन राहुल यांनी मोदींवर निशाणा साधला. ‘काल (१७ डिसेंबर) काँग्रेसच्या दोन मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची घोषणा केली. कर्जमाफीचा निर्णय घ्यायला त्यांना सहा तासदेखील लागले नाहीत. पंरतु मोदी यांनी साडेचार वर्षांपासून पंतप्रधान आहेत.

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील काँग्रेसचा विजय हा गरीब जनतेचा, तरुणांचा, मजुरांचा, शेतकऱ्यांचा विजय असल्याचे राहुल यांनी म्हटले आहेत. राहुल यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन मोदींना थेट लक्ष्य केले. ‘मोदींनी देशाला दोन भागांमध्ये विभागले आहे. यातील एका भागात फक्त १५ जण आहेत. यामध्ये मोदींचे लाडके उद्योगपती आहेत. त्यांचे कर्ज लगेच माफ होते. परंतु दुसऱ्या भारतात असलेल्या सर्वसामान्य जनतेला काही मिळत नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…तर मी शहांना भेटायला गेल्याच्या बातम्या येतील !

News Desk

राज ठाकरेंच्या पत्रावर देवेंद्र फडणवीसांनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

Aprna

दाल में कुछ काला है!

News Desk