HW News Marathi
राजकारण

मनसेला 12 वर्षे पूर्ण, पक्ष टिकवण्याचे राज ठाकरेंपुढे आव्हान

मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आज 12 वर्षे पूर्ण झाले आहेत. 9 मार्च 2009 साली राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करून मनसेची स्थापना केली होती. यानंतर 2009 साली झालेल्या विधानसभेच्या पहिल्याच निवडणुकीत राज ठाकरेंनी आपल्या पक्षाचे 13 आमदार निवडून आणण्याची कमाल केली होती.

मधल्या काळात मनसेचा प्रभाव वाढला होता. त्यानंतर त्यांनी नाशिक महापालिकेत सत्ता मिळवली होती. परंतु राज ठाकरे ठोस काही काम करू शकले नाही. त्यामुळे त्यांच्या पक्षाला उतरती कळा लागली. गेल्या निवडणुकीत मनसेच्या ताब्यातील नाशिक महापालिका देखील हातून गेली. त्यानंतर त्यानंतर त्यांच्याकडे सध्या केवळ एक आमदार शिल्लक आहे.

इतर राजकीय पक्षासोबत हातमिळवणी करण्याशिवाय त्यांच्यासमोर सध्यातरी कुठलाही पर्याय नाही. त्यामुळे ते कधी शिवसेनेसोबत टाळी देण्याचा प्रयत्न करतात तर कधी विरोधकांच्या गटात सामिल होतात. राज ठाकरे कार्यकर्त्यांमध्ये मिसळत नाहीत, असा एक संदेश लोकांमध्ये गेलेला असल्याने अनेकजण त्यांच्यापासून दुरावले आहे.

परंतु गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून ते पुन्हा सक्रिय झाले आहे. त्यांनी सोशल मीडियाचा खुबीने वापर करून सरकार व विरोधकांवर टीका कार्टुनच्या माध्यमातून टीका सुरू केली आहे. पुढील एक दीड वर्षानंतर देश, राज्यात निवडणुका होत आहेत. त्यासाठी राज ठाकरे यांनी तयारी सुरू केल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, तपपूर्तीनिमित्त राज ठाकरे कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करतात, याकडे राज्याचे लक्ष्य लागले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यात ६०.२१ टक्के मतदान

News Desk

पत्रकार शशिकांत वारिशे हत्याप्रकरणी अजित पवार सभागृहात आक्रमक; म्हणाले…  

Aprna

शरद पवार योग्य बोलतात, त्यांचे घर पैशाने भरलेले !

News Desk