HW News Marathi
राजकारण

फक्त राज्यमंत्री पद देऊन तोंडाला पाने पुसण्यात आली !

मुंबई | राज्यमंत्री पद देऊन तोंडाला फक्त पाने पुसण्यात आली, अशी आरपीआय नेत्यांची भावना असल्याचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले आहे. मात्र आरपीआयला तीन जागा मिळाव्यात, अशी मागणी आठवले यांनी केली आहे. आठवले यांच्या उपस्थित आज (२५ फेब्रुवारी) घेण्यात आलेल्या बैठकीत ते म्हणाले की, स्वतंत्र चिन्हावर निवडणूक लढविण्याची आरपीआयच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे. तसेच सगळ्यांकडून खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला जातोय, त्याकडे दुर्लक्ष करा, असा सल्ला आठवले यांनी आरपीयआय कार्यकर्त्यांना दिला आहे.

आठवले यांनी काल (४ फेब्रुवारी) पुण्यात पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत आठवले म्हणाले की, भाजप आणि शिवसेना यांच्यात झालेल्या युतीचे आरपीआयतर्फे स्वागतच आहे. परंतु आरपीआयला एकही जागा न दिल्यामुळे देशभरातील आरपीआय कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. त्यामुळे आरपीआयला लोकसभेसाठी एक जागा द्यावी, अशी मागणी आठवले यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#MaharashtraElections2019 | बीडमध्ये बोगस मतदानाचा आरोप, संदीप क्षीरसागर आक्रमक

News Desk

संसदीय कार्यमंत्री विनोद तावडे यांनी घेतली विरोधी पक्ष नेत्यांची भेट

News Desk

ठाकरे कुटुंबियांच्या बेहिशेबी संपत्तीसंदर्भातील याचिका न्यायालयाने ‘या’ कारणामुळे फेटाळली

Aprna