HW News Marathi
राजकारण

राणेंचा मंत्रीमंडळ प्रवेश लांबणीवर, हिवाळी अधिवेशनानंतर होणार मंत्रीमंडळ विस्तार

मुंबई : गुजरात निवडणूकांच्या पार्श्वभुमीवर महाराष्ट्रातील राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार हिवाळी अधिवेशनानंतर करण्याचा निर्णय भाजपच्या कोअर कमिटीत झाल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. त्यामुळे नारायण राणेंचा मंत्रीमंडळातील प्रवेश आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. दरम्यान नारायण राणेंच्या मंत्रीमंडळ प्रवेशाला शिवसेनेसोबतच भाजपमधूनही विरोध होत असल्याचं समोर येतय.

‘वर्षा’ बंगल्यावर झालेल्या या बैठकित देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे, एकनाथ खडसे, चंद्रकांत पाटील, विनोद तावडे आदी मंत्री उपस्थित होते. दरम्यान महाराष्ट्रात मंत्रीमंडळ विस्तारासाठी भाजप पक्षश्रेष्ठी फारशी उत्सुक नाही. त्यातच नारायण राणेंच्या मंत्रीमडळ प्रवेशासाठी भाजपच्या एका जेष्ठ नेत्याने विरोध दर्शविल्याची माहीती देखील कळते…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

‘भारतरत्न’ पुरस्कारावर राजकारण ?

News Desk

भाजप-सेना युतीच्या पार्श्वभूमीवर मनसेची खोचक टीका

News Desk

आजच्या तारखेला निवडणुका झाल्या तर काय असेल भाजपची स्थिती ?

News Desk
देश / विदेश

रामजन्म भुमी वगळता कुठेही मशीद बांधता येईल- सुब्रमण्यम स्वामी

News Desk

भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी आणखी एक वादग्रस्त विधान केलं आहे. रामजन्मभुमी वगळता कुठेही मशिद बांधता येईल अस वक्तव्य स्वामी यांनी केलय. सौदी अरेबियामध्ये मशिदी तोडण्यात आल्यानंतर त्या मशिदींची जागा बदलण्यात आली होती. त्याच धर्तीवर भारतात देखील बाबरी मशिद मुस्लीम बहुल भागात हलवण्यात येऊ शकते असं स्वामी यांनी सुचवल्यामुळे नवी वाद निर्माण होण्याची चिन्ह दिसत आहे. भारतातील तब्बल २४००० मंदीर प्राचीन काळात तोडण्यात आली होती. आम्ही यापैकी फक्त मथुरेचं कृष्ण मंदीर, अयोध्येचं राम मंदीर आणि वाराणसीचं काशी विश्वनाथ या मंदिरांच्या उभारणीसंदर्भातच बोलत असल्याचही त्यांनी म्हटलय.

बाबरी मशिद प्रकरण हे सध्या सुप्रीम कोर्टाच्या अखत्यारीत आहे. या प्रकरणात कोर्टाबाहेरच सेटलमेंट करण्याचा पर्याय देखील सुप्रीम कोर्टानं सुचवला होता.

Related posts

पाकिस्तानी सापाचा फणा मोदी यांनी ठेचला, आता या विंचवांच्या नांग्या मोडा!

News Desk

आजपर्यंत भारताने कधीही प्रथम अण्वस्त्रांचा वापर केलेला नाही, पण आता…!

News Desk

शहीद भगतसिंगांचं ते पिस्तुल 90 वर्षांनंतर जगासमोर

News Desk