HW News Marathi
राजकारण

आम्ही कमळाच्या चिन्हावर लढलो तरीही भाजपमध्ये गेलेलो नाही !

नाशिक | “आम्ही कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवत असलो तरीही भाजपमध्ये गेलेलो नाही. भाजप हा आमचा मित्रपक्ष आहे”, असे विधान रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले आहे. आगामी विधानसभेकरिता महायुतीकडून रिपाईला ६ जागा सोडण्यात आल्या असून भाजपच्या मागणीनुसार यंदाच्या निवडणुकीत रिपाई भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढविणार आहे. याच पार्श्वभूमीवर बोलताना रामदास आठवले यांनी काहीशी नाराजी व्यक्त केली आहे. रामदास आठवले हे त्यांच्या नाशिकमध्ये बोलत होते

“आम्ही कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवत असलो तरीही भाजपमध्ये गेलेलो नाही. भाजप आमचा मित्रपक्ष आहे. मात्र, मी ६ जागांवर समाधानी नाही. जरी जागावाटपावर मी आता समाधानी नसलो तरीही दुसरा कोणताही पर्याय नसल्याने आमच्या वाट्याला जे येईल त्यात आम्ही समाधान मानतो आहे. मात्र, रिपाईला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद हवेच आहे”, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे. रामदास आठवले हे जागावाटप आणि भाजप चिन्हावर निवडणूक लढविण्याबाबत नाराज असल्याचे यावेळी पाहायला मिळाले.

आपल्या मित्रपक्षांनी कमळाच्या चिन्हावरच निवडणूक लढवावी अशी भाजपची आग्रही मागणी होती. मात्र, रामदास आठवले यांनी वारंवार यास आपला नकार दर्शविला होता. “आम्ही जर भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवली तर आमच्या पक्षाचे स्वतंत्र अस्तित्त्वाच राहणार नाही. त्यामुळे आम्ही आमच्याच चिन्हावर लढणार”, असे रामदास आठवले यांनी म्हटले होते. मात्र, आता रामदास आठवले नाराजीने का होईना पण कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढण्यास तयार झाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#LokSabhaElections2019 : भाजपने उमेदवारी दिली तर माढ्यातून लढणार !

News Desk

“वेदांता फॉक्सकॉन महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला का गेली?”, आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारला सवाल

Aprna

रथयात्रेमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना रथाखाली चिरडू !

Gauri Tilekar