HW News Marathi
राजकारण

सरकारने मागितला तरचं RSS सल्ला देते । डॉ भागवत

नवी दिल्ली | सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधकांवर निशाणा साधला. नागपुरामधून देशाचे सरकार चालत नसल्याचे भागवत म्हणाले. मंगळवारी दिल्ली मध्ये झालेल्या भविष्यातील भारत या कार्यक्रमात ते बोलत होते मागितला तरच आरएसएसकडून सल्ला दिला जातो, असा टोला भागवतांनी मोदी विरोधकांना लगावला.

“हा जो अंदाज लावला जातो, की नागपुरातून फोन जातो. सल्ला दिला जातो की कुणी काय करायचे ? हे सर्व खोटे आहे. त्यांना सल्ला हवा असेल, तरच सल्ला दिला जातो”, असे मोहन भागवत म्हणाले.

”राजकारणावर आमचा कोणताही प्रभाव नाही आणि त्यांच्या सरकारवरही आमचा प्रभाव नाही. ते स्वयंसेवक आहेत. त्यांचाही स्वतःचा विचार आहे. या स्वातंत्र्याने आणि स्वायत्ततेनेच सरकार चालवले जाते . घटनेनुसार सत्तेचे केंद्र अबाधित राहिले पाहिजे, असे संघाचे मत आहे आणि असे न झाल्यास ते चुकीचे असेल,” असेही यावेळी बोलताना मोहन भागवत म्हणाले.

”राष्ट्रीय मुद्द्यावर आम्ही मत जरुर मांडतो. जे सरकारमध्ये आहेत, त्यांना वाटले तर आमचे मत विचारतात. आम्ही मत मांडण्यात सक्षम असू तरच मत मांडतो, अन्यथा आमचा विचार थोपवत नाही. संघाने जन्मापासूनच निश्चित केलेले आहे, की राजकारणाशी काहीही देणेघेणे नसेल,” असे मत डॉ भागवत यांनी यावेळी मांडले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चंद्राबाबू नायडू नंतर ममतानेही सीबीआयला रोखले

News Desk

मराठा आरक्षणाचा एटीआर विधानसभेत मांडणार

News Desk

जगातील ह्या आभासी मोठ्या पक्षाची सध्या लावारीस भक्तांवरच भिस्त, मनसेचे प्रत्युत्तर

News Desk