HW News Marathi
राजकारण

शिवराज सिंह चौहान यांच्या काळात दोन हजार कोटींचा घोटाळा !

नवी दिल्ली | मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी एक अत्यंत गंभीर आरोप केला आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांच्या नावाखाली तब्बल दोन हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप कमलनाथ यांनी केला आहे. अनेक कर्ज न घेतलेल्या शेतकऱ्यांच्या नावांचा समावेश कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांच्या नावांच्या यादीत करण्यात आल्याचे कमलनाथ यांनी सांगितले आहे.

आज काही शेतकरी मला भेटून गेले. त्यांनी कर्ज घेतलेले नसतानाही त्यांच्या नावांचा समावेश कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांच्या नावांच्या यादीत करण्यात आला होता. या प्रकरणी आम्ही कठोर कारवाई करणार असल्याचे कमलनाथ यांनी म्हटले आहे. यावेळी अनेक मृत शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज घेण्यात आल्याचे कमलनाथ यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“दावोसला जाण्यापेक्षा गुजरातला जा”, संजय राऊतांची राज्य सरकारवर बोचरी टीका

Aprna

मनसेतून शिवसेनेत गेलेल्या नगरसेवकाकडे लाखोंची बेहिशोबी मालमत्ता – नगरसेवकांविरोधात गुन्हा दाखल

swarit

रामदास आठवले आज घेणार केंद्रीय मंत्रिपदाची शपथ

News Desk