HW News Marathi
राजकारण

मोदी सरकारच्या विमान प्रवास खर्चात लक्षणीय घट

नवी दिल्ली | मोदी सरकारला दिलासा देणारी एक आकडेवारी माहिती अधिकाराच्या माध्यमातून समोर आली आहे. पंतप्रधानपदी विराजमान झाल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे परदेश दौरे हे कायमच चर्चेचा विषय बनले आहेत. पंतप्रधान मोदी आणि भाजप सरकारमधील मंत्र्यांच्या परदेश दौऱ्यांवरील खर्चावर वारंवार टीका होत असली तरी आता या आकडेवारीनुसार गेल्या चार वर्षांमध्ये भाजप मंत्र्यांच्या विमान प्रवास खर्चात लक्षणीय घट झाल्याचे आढळून आले आहे.

माहिती अधिकारातून करण्यात आलेल्या मागणीनंतर कॅबिनेटच्या जमाखर्च विभागाने सादर केलेली आकडेवारी ही मोदी सरकारला निश्चितच दिलासा देणारी आहे. भाजपचे कॅबिनेट मंत्री तसेच राज्यमंत्र्यांच्या परदेश दौऱ्यांवर गेल्या साडे चार वर्षांमध्ये करण्यात आलेल्या खर्चाची माहिती देण्याची मागणी माहिती अधिकारामार्फत करण्यात आली होती. या आकडेवारीनुसार, १ एप्रिल २०१४ ते ३१ मार्च २०१८ या कालावधीत झालेल्या कॅबिनेट मंत्र्यांच्या परदेश दौऱ्यांचा विमान खर्च २२५.३० कोटी रुपये तर राज्यमंत्र्यांच्या परदेश दौऱ्यांचा खर्च १३.७५ कोटी रुपये इतका असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

भाजप मंत्र्यांच्या विमान प्रवास खर्चाची आकडेवारी

वर्ष खर्च

२०१४-१५ ९०.८८ कोटी

२०१५-१६ ८०.५१ कोटी

२०१६-१७ ४०.०२ कोटी

२०१७-१८ २७.६४ कोटी

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

गेल्या ५ वर्षात सुप्रिया सुळेंसह शत्रुघ्न सिन्हा यांच्या संपत्तीत वाढ

News Desk

कावेबाज चीनचा भारताला सर्व बाजूंनी विळखा घालण्याचा प्रयत्न | ठाकरे

News Desk

मतदान करणे हे आपले कर्तव्य, सर्वांनी आपले कर्तव्य बजावण्याची गरज | मोहन भागवत

News Desk
देश / विदेश

आण्णा हजारेंच्या आरपारच्या क्रांतीला प्रारंभ

News Desk

नवी दिल्ली | ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाला आजपासून दिल्लीतून सुरुवात झाली आहे. अण्णा हजारे यांनी या आंदोलनाला अखेरची लढाई असे संबोधले आहे. स्वातंत्र्यांची दुसरी लढाई असे यापूर्वीच्या आंदोलनाला नाव देण्यात आले होते. त्यातून केजरीवाल व आप नावाचा पक्ष उदयास आला होता.

यावेळी आण्णा हजारे यांच्या आंदोलनाचे फलित काय राहणार आहे, याचा सर्वांना प्रश्न पडला आहे. गेल्या तीन साडेतीनवर्षे अण्णा शांत बसून होते. त्यांनी केंद्राच्या कारभारावर वेळोवेळी टीका केली. परंतु त्याची केंद्राने दखले घेतली नाही. अखेर अण्णांना आंदोलनाचे हत्यार उपसावे लागले.

शुक्रवारी सकाळी अण्णांनी रामलीला मैदानावर आपल्या आंदोलनाला सुरुवात केली. स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी, शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव, जनलोकपालची अंमलबजावणी या अण्णांच्या प्रमुख मागण्या आहेत. रामलीला मैदानावर देशभरातून आंदोलक दाखल होत आहेत.

आंदोलन दडपण्यासाठी सरकारने दिल्लीकडे येणाऱ्या रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. त्यामुळे आंदोलकांना एकप्रकारे सरकार हिंसेसाठी प्रवृत्त करत असल्याचा गंभीर आरोप अण्णा हजारे यांनी केला आहे.

Related posts

“…. तर मात्र राज्याची स्पष्ट भूमिका मांडू” – जीएसटी संदर्भात अजित पवारांचा इशारा

News Desk

आता महाराष्ट्रासह भगतसिंह कोश्यारींकडे आणखी एका राज्याची जबाबदारी 

News Desk

इराणमधून २०० जण आज मुंबईत येणार

swarit