HW News Marathi
राजकारण

लोकसभेच्या सहाव्या टप्प्यात ‘या’ दिगज्जांनी बजावला मतदानाचा हक्क

नवी दिल्ली | देशभरात आज (१२ मे) लोकसभा निवडणुकांचा सहावा टप्पा पार पडत आहे. या सहाव्या टप्प्यात ७ राज्यांतील ५९ मतदारसंघासाठी मतदान सुरु आहे. सुमारे १० कोटी १८ लाख मतदार यावेळी आपला मतदानाचा हक्क बजावतील. दरम्यान, या टप्प्यात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह देशभरातील अनेक दिगज्जांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. या टप्प्यात काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया, दिग्विजय सिंह, शीला दीक्षित, भाजपचे नेत्या मनेका गांधी, साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, गौतम गंभीर, मनोज तिवारी तर सप अध्यक्ष अखिलेश यादव, आप उमेदवार अतिशी, राघव छड्डा यांसह अन्य अनेक उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत सीलबंद होणार आहे. या टप्प्यात राजधानी दिल्लीसह अन्य महत्त्वाच्या राज्यांचा समावेश असल्याने याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.

  • काँग्रेसच्या पूर्व उत्तर प्रदेशच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी बजावला मतदानाचा हक्क

  • भाजपच्या भोपाळ मतदारसंघाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा यांनी केले मतदान

  • भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने बजावला मतदानाचा हक्क

  • भाजपचे पूर्व दिल्ली मतदारसंघाचे उमेदवार गौतम गंभीर यांनी बजावला मतदानाचा हक्क

  • दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसच्या ईशान्य दिल्लीच्या उमेदवार शीला दीक्षित यांनी बजावला मतदानाचा हक्क

  • राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बजावला मतदानाचा हक्क

  • आपच्या पूर्व दिल्ली मतदारसंघाच्या उमेदवार अतिशी यांनी बजावला मतदानाचा हक्क

  • काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी बजावला मतदानाचा हक्क

  • दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बजावला मतदानाचा हक्क

  • परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी बजावला मतदानाचा हक्क

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

 मोदी विष्णूचा तेरावा अवतार तर शहा चाणक्य !

News Desk

चंद्रकांत खैरे यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे !

News Desk

#Elections2019 : जाणून घ्या…सोलापूर मतदारसंघाबाबत

News Desk