HW News Marathi
राजकारण

वॅक्स म्युझियममध्ये आता आठवलेंचा पुतळा  

मुंबई | दलितांचे नेते म्हणून रामदास आठवले भारतासह जगात प्रसिद्ध आहेत. त्यामुळे त्यांचा मेणाचा पुतळा आपल्या वॅक्स म्युझियम मध्ये उभारण्याचा निर्णय सुनील कंडलूर यांनी घेतला . त्यानंतर सुनील कंडलूर यांनी रामदास आठवले यांचा मेनाचा पुतळा बनवणून घेतल्यानंतर १८ मे रोजी या पुतळ्याचा अनावरण सोहळा मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला.

लोणावळ्यात असलेल्या सुप्रसिद्ध वॅक्स म्युझियम मध्ये अनेक जगप्रसिद्ध लोकप्रिय व्यक्तिमत्वांचे मेणाचे पुतळे उभारण्यात आले आहेत.भारतीय लोकप्रिय राजकीय नेत्यांचे पुतळेही त्यात आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आदी मान्यवरांच्या पुतळ्यांसोबतच आता रामदास आठवलेंचाही मेणाचा पुतळा विराजमान होणार आहे. रामदास आठवलेंच्या मेणाच्या पुतळ्याचे उदघाटन 18 मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते व रामदास आठवले यांच्या उपस्थित झाले. यानंतर हा मेणाचा पुतळा लोणावळ्यातील वॅक्स म्युझियम मध्ये ठेवण्यात येणार आहे .

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

संसदेत मोदी १५ मिनिटे उभे रहाणार नाहीत | राहुल गांधी

News Desk

अनंत गितेंना फडणवीसांचा पाठिंबा; म्हणाले…

News Desk

गिरीश महाजनांच्या संपर्क कार्यलयाजवळ बॉम्ब असल्याचा निनावी फोन

News Desk
राजकारण

गरीबांचा विचार भाजप करत नाही | उद्धव ठाकरे

News Desk

मुंबई | कर्नाटक मध्ये 116 आमदार असणाऱ्या काँग्रेस-जेडीएसला डावलून बहुमत गाठिशी नसणाऱ्या भाजपाला सत्ता स्थापनेचे निमंत्रण देणाऱ्या राज्यपाल वजुभाई वाला यांचा गुरुवारी उद्धव ठाकरेंनी उल्हासनगर येथे झालेल्या सभेत चांगलाच समाचार घेतला. ‘राज्यपाल भारतीय जनता पक्षाचे नम्र सेवक आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या गुजरात मंत्रिमंडळात राज्यपाल वजुभाईंनी १४ वर्षे काम केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कृपेनेच ते कर्नाटकच्या राज्यपालपदी बसले आहेत. त्यामुळे भाजपला सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिले असल्याचा आरोप यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला. त्याचबरोबर सत्तेत आलेले भाजप सरकार गरीबांचा विचार करत नसल्याची टिकाही त्यांनी यावेळी बोलताना केली.

यावेळी बोलाताना उद्धव म्हणाले, भाजप कर्नाटकमध्ये ज्या प्रकारे सरकार स्थापन करण्यासाठी अट्टाहास करत आहे तितक्याच मेहनतीने राम मंदिर का बांधत नाही ? येडियुरप्पांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासून माझा राज्यपालांच्या पदावरचा विश्वास उडाला आहे. जर अशी लोकशाही भाजप देऊ इच्छित असेल तर आम्हाला अशी लोकशाही नको आहे. लोकशाहीमध्ये ज्या पक्षाकडे सर्वात जास्त आमदार किंवा खासदार असतात त्यांनाच सरकार प्रस्थापित करण्याची संधी दिली जाते. परंतु कर्नाटक निवडणुकीत हे कुठेच पहायला मिळाले नाही.

https://www.facebook.com/hwmarathi/videos/464283637338438/

हिंदुत्व हे भाजपाला फक्त निवडणुक काळातच आठवते मात्र एकदा निवडणुक झाल्यानंतर ते कोणासोबतही सरकार बनवायला तयार होतात. मग ते मुफ्ती असतो किंवा अजून कोणी असो. पण आज लोकसभा किंवा विधानसभा कोणतीही निवडणुक झाली किंवा दुन्ही एकसाथ झाली तरीही शिवसेना निवडणुक लढायला आणि जिंकायला तयार आहे असे म्हणत कर्नाटक के राज्यपाल वजुभाई वाला पुर्वी कोण होते हे जनतेने जाणून घेण्याची गरज आहे असेही ते यावेळी बोलताना म्हणालेत.

Related posts

शिवरायांच्या उंचीचा नेता-पुतळाही नाही, तुम्हीही सांगा! तरच तुम्ही महाराष्ट्राचे!

News Desk

अमेठीच्या पराभवाला घाबरून राहुल गांधी पळाले वायनाडला !

News Desk

फडणवीसांच्या कार्यकाळात तब्बल ६५ हजार कोटींचा आर्थिक घोटाळा

News Desk