HW News Marathi
राजकारण

जस्टिस लोया प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निर्णय असमाधानकारक | संजय निरुपम 

मुंबई | जस्टिस लोया यांच्या हत्ये प्रकरणी सरकारने दिलेल्या निर्णयाशी आम्ही असहमत असल्याचे काँग्रेसचे संजय निरुपम म्हणालेत. निरुपम गुरुवारी मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलत होते. सुप्रीम कोर्टाने जस्टिस लोया यांचा मुत्यू नैसर्गिक असल्याचा निर्णय दिला आहे. लोया यांच्या मृत्यूची चौकशी करण्याची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली असताना या प्रकरणात कोणतीही स्वतंत्र चौकशी होणार नसल्याचे म्हटले आहे.

सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश दीपक मिश्रा, जस्टिस धनंजय चंद्रचूड आणि जस्टिस अजय खानविलकर यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. न्यायमुर्ती लोया ज्या केसचे न्यायमुर्ती होते त्या केसमध्ये अमित शहा मुख्य आरोपी होती. लोयांचा मृत्यू झाल्यामुळे दुस-या जजने अमित शहा यांना निर्दोष सोडले.

आज आम्ही कोर्टाने दिलेल्या निर्णयाशी असहमत असूनही काही करु शकत नाही. कारण हा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिले आहे. अशी हतबलताही यावेळी निरुपम यांनी पत्रकारांशी बोलताना बोलून दाखवली.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

…नाहीतर त्यांनी माझ्या नेतृत्त्वाखाली काम करावे | रामदास आठवले

News Desk

#MeToo प्रकरणात पोलिसांनी दोन्ही बाजू तपासाव्यात !  

News Desk

संतापजनक ! नांदेडमध्ये २ शिक्षकांकडून अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार

News Desk
देश / विदेश

अधिकवेळा एटीएममधून पैसे काढल्यास दंड भरावा लागणार

News Desk

मुंबई | एटीएम मध्ये मुबलक पैसे उपलब्ध होतात की नाही तो पर्यंतच सर्वसामान्यांना आणखी एका धक्याला सामोरे जावे लागणार आहे. जास्तीत जास्त ५ वेळा एटीएम मधून नागरीकांना पैसे काढता येणार आहेत. ५ पेक्षा जास्त वेळा पैसे काढल्यास प्रत्येक वेळी २० रुपये धील खडखडाट बंद होतो की नाही, तोपर्यंतच आणखी एक झटका बसणार आहे. 5 पेक्षा जास्तवेळा एटीएममधून पैसे काढल्यास, प्रत्येक ट्रान्झॅक्शनला 20 रुपये दंड आकारला जाणार आहे.

एटीएम ऑपरेटर्सनी ट्रान्झॅक्शन चार्ज वाढवण्याची मागणी केल्यामुळे हा दंड आकारला जाणार असल्याचे बोलले जात आहे. सध्या देशात 19 कंपन्यांकडे एटीएम कॅश मॅनेजमेंटचे काम आहे. या कंपन्यांना हा सर्व भार सोसावा लागतो असल्याने त्या कंपन्या बँकांकडून तो वसुल करतात. तर बँका तो चार्ज ग्राहकांवर लादणार आहेत.

एटीएम संदर्भातील हे नियम जुलै महिन्यापासून लागू करण्यात यावेत असे आरबीआयने बॅंकांना बजावले आहे. कॅशव्हॅनसाठी आरबीआयने केलेल्या नियमानुसार, कॅश मॅनेजमेंट कंपन्यांकडे कमीत कमी 300 कॅश व्हॅन, प्रत्येक कॅश व्हॅनमध्ये एक ड्रायव्हर, दोन बंदुकधारी आणि दोन कर्मचारी असणे बंधनकारक रहाणार आहे. एटीएम संदर्भातील हा सर्व खर्च बँकांना न परवडणारा असल्यामुळे एटीएम ट्रान्झॅक्शनवरील चार्ज वाढवण्याचा निर्णय बॅंकांनी घेतला आहे.

Related posts

काँग्रेस उमेदवार अलका लांबांनी ‘आप’च्या कार्यकर्त्याला कानशिलात लगावली

swarit

अंतिम परीक्षेसंदर्भातील निकाल सुप्रीम कोर्टाने राखून ठेवला

News Desk

दसरा गेला, आता बळीराजाची दिवाळी तरी गोड करा ! पंकजांनी घेतली नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट 

News Desk