HW News Marathi
राजकारण

राजकारणातील निवृत्तीपूर्वी सुशीलकुमार शिंदेंनी जनतेची माफी मागावी !

मुंबई | कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी मतदारांशी सहानभूती मिळविण्यासाठी आपली ही शेवटची निवडणूक असल्याचे आवाहन केले आहे. परंतु, सुशीलकुमार शिंदे राज्याचे मुख्यमंत्री होते, केंद्रीय गृहमंत्री होते, कॉंग्रेस परिवाराच्या जवळ होते. मग जे तुम्ही सोलापूरचे प्रश्न आज मांडत आहेत ते आतापर्यंत तुम्ही का सोडवू शकला नाहीत ?, असा सवाल शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केला आहे. त्याचप्रमाणे “राजकारणातून निवृत्त होण्यापूर्वी हिंदू दहशतवाद हा शब्दप्रयोग केल्याप्रकरणी सुशीलकुमार शिंदे यांनी जनतेची माफी मागितली पाहिजे”, अशी मागणीही तावडे यांनी यावेळी केली.

प्रसार माध्यमांशी बोलताना विनोद तावडे म्हणाले की, “कॉंग्रेसचे दुसरे नेते अशोक चव्हाणसुध्दा सहानुभूती गोळा करीत आहेत. आता मला वाचावा असे ते मतदारांना सांगत आहेत. परंतु, अशोकी चव्हाण वर्षोनुवर्षे राजकारणात असूनही त्यांनी जनतेची कामे केली नाहीत. केवळ सहानभूती दाखवून जनतेची मते मिळत नाही. जर जनतेची कामे केली तर जनता तुमच्या पाठीशी उभे राहते”, असा टोलाही विनोद तावडे यांनी यावेळी लगावला आहे.

“न्या. लोया प्रकरणात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या विरोधात जयश्री पाटील यांनी याचिका दाखल केली होती. त्याच जयश्री पाटील या मराठा आरक्षण विरोधातील याचिकाकार्त्या आहेत, अशी माहिती आहे. अँड. सदावर्ते हे पाटील यांचे वकील आहेत. मग अमित शहा यांच्या विरोधात याचिका करणारे आणि मराठा आरक्षणाला विरोध करणारे एकच असतील तर याचा बोलिवता धनी कोण हे आपण जनतेला सांगावे”, असे आवाहन विनोद तावडे यांनी शरद पवार यांना केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#Elections2019 : जाणून घ्या…दिंडोरी मतदार संघाबाबत

News Desk

अभिनेता अक्षय कुमारला भाजपकडून तिकीट मिळणार ?

News Desk

पश्चिम बंगालमध्ये भाजपला विजयी रॅली काढू देणार नाही !

News Desk