HW News Marathi
राजकारण

आमदार फुटीच्या बातम्या पूर्णपणे खोट्या !

मुंबई | “शिवसेनेच्या सर्व आमदारांनी शिवसेनेच्या पक्ष नेतृत्त्वाकडे सर्व निर्णयांचे अधिकार दिलेले आहेत. शिवसेनेच्या सर्व आमदारांचा आणि कार्यकर्त्यांचा उद्धव ठाकरेंवर संपूर्ण विश्वास आहे. त्यामुळे आमदार फुटण्याच्या प्रयत्नात असल्याच्या बातम्या पूर्णपणे चुकीच्या, खोट्या आहेत”, असे विधान शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बुधवारी (२० नोव्हेंबर) प्रसारमाध्यमांशी बोलताना केले आहे. विधानसभा निवडणुकांच्या निकालांपासून राज्यातील सत्तास्थापनेवरून निर्माण झालेल्या प्रचंड राजकीय अस्थिरतेच्या आणि अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यात ‘महाशिवआघाडी’च्या चर्चा सुरु असल्या तरीही काँग्रेस-राष्ट्रावादीच्या तळ्यातमळ्यात अशा भूमिकेमुळे शिवसेनेची चांगलीच कोंडी झाली आहे. दिवसेंदिवस लांबत चाललेला राज्यातील सत्तास्थापनेचा विषय आणि अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या आमदारांमध्ये निर्माण झालेली असुरक्षितता यामुळे शिवसेनेचे आमदार फुटण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त समोर येत होते. मात्र, एकनाथ शिंदे यांनी या वृत्ताचे पूर्णपणे खंडण केले आहे. “उद्धव ठाकरे योग्य वेळी योग्य तो निर्णय घेतील असा विश्वास आम्हा सर्वांना आहे. पक्षाचे आमदार फुटण्याचा प्रश्न येत नाही. त्यामुळे अशा कोणत्याही बातम्यांवर विश्वास ठेऊ नये.

“शुक्रवारी स्वतः उद्धव ठाकरे पक्षाच्या सर्व आमदारांशी बोलणार आहेत”, अशीही माहिती एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली आहे. शुक्रवारी (२० नोव्हेंबर) मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाखाली शिवसेनेच्या सर्व आमदारांची बैठक होणार आहे. त्यासाठी शिवसेनेचे सर्व आमदार मुंबईत दाखल होणार आहेत. या बैठकीत शिवसेनेची पुढची रणनीती निश्चित करण्यात येईल, अशी माहिती मिळत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गहिनीनाथ गडावरील कार्यक्रमात उपमुख्यमंत्र्यांची हजेरी; तर मुंडे बहिणींची दांडी

Aprna

प्रज्ञा सिंह प्रकरणी शिवेसना शांत का ? मिलिंद देवरा यांचा सवाल

News Desk

संकट आलं म्हणजे नाउमेद व्हायचं नसतं ! 

News Desk