HW News Marathi
राजकारण

लोकसभा निवडणुकीचे बिगूल वाजले, आजपासून देशभरात आचारसंहिता लागू

नवी दिल्ली | देशभरातील सतराव्या लोकसभा निवडणुकीचे आज (१० मार्च) बिगूल वाजणार आहे. निवडणूक आयोगाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत आजपासून देशभरात आचारसंहिता लागू झाल्याची माहिती मुख्य निवडणूक आयोग आयुक्त सुनील अरोरा यांनी सांगितले आहे. दिल्लीच्या विज्ञान भवनामध्ये निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सुरू आहे. देशभरात ७ टप्पयात लोकसभा निवडणूका होणार आहेत. तर २३ ‘मे’ला लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत. महाराष्ट्रात ४ टप्प्यात लोकसभा निडवणुका होणार आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका होणार नसल्याचे निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त अरोरा यांनी सांगितले.

महाराष्ट्रात या ४ टप्प्यात होणार लोकसभा निवडणुका

महाराष्ट्रात ४ टप्प्यात लोकसभा निडवणुका होणार आहेत. महाराष्ट्रात ११ एप्रिल ७ जाग, १८ एप्रिल १० जाग तर २३ एप्रिल १४ जाग, २९ एप्रिल १७ जागांसाठी लोकसभा निवडणुका होणार असल्याचे निवडणूक आयोगाने आज झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

 

देशभरात ७ टप्प्यात लोकसभा निवडणुका होणार

यंदा देशभरात लोकसभा निवडणुका या ७ टप्प्यात पार पडणार आहे. ११ एप्रिल पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. तर १८ एप्रिल दुसऱ्या टप्प्याचे मतदान होणार आहे. २३ एप्रिल तिसऱ्या टप्प्यातील मतदान, २९ चौथ्या टप्प्यातील मतदान, ६ मे पाचव्या मतदान, १२ मे सहाव्या टप्प्याचे मतदान आणि १९ मेला सातव्या शेवटच्या टप्प्याचे मतदान होणार आहे.

 

 

पत्रकार परिषदेतील महत्त्वाची मुद्दे

  • देशातील मतदारांची संखा ९० कोटी

  • २०१४च्या तुलनेत ७ कोटी मतदार वाढले

  • १९ ते १९ वयोगटातील मतदारांची संख्या दीड कोटी
  • दीड कोटी नोकरदार मतदारांची संख्या
  • यंदा ९० कोटी लोक मतदान करणार
  • ईव्हीएमवर उमेदवाराचा फोटो असणार
  • मतदान केंद्र व्हीव्हीपॅड सुविधा उपलब्ध होणार
  • राजकीय पक्षांशी चर्चा झाली आहे
  • देशभरात आजपासून आचारसंहिता लागू झाली
  • ९९.३ मतदारांकडे मतदान ओळख पत्र
  • देशात १० लाख मतदान केंद्र असणार
  • ७ टप्प्यात लोकसभा निवडणूका होणार

  • २३ ‘मे’ला लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होणार
  • ११ एप्रिला पहिल्या टप्प्यातील मतदान
  • १८ एप्रिला दुसऱ्या टप्प्यातील मतदान
  • २३ एप्रिला तिसऱ्या टप्प्यातील मतदान
  • २९ चौथ्या टप्प्यातील मतदान
  • ६ मे पाचव्या मतदान
  • १२ मे सहाव्या टप्प्याचे मतदान
  • १९ मेला सातव्या शेवटच्या टप्प्याचे मतदान
  • महाराष्ट्रात ४ टप्प्यात लोकसभा निवडणुका होणार आहेत.
  • ११ एप्रिल ७ जागांसाठी मतदान होणार
  • १८ एप्रिल १० जागांसाठी मतदान होणार
  • २३ एप्रिल १४ जागांसाठी मतदान होणार
  • २९ एप्रिल १७ जागांसाठी लोकसभा निवडणुका होणार

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या होण्याची शक्यता

Aprna

भाजपचे हे ‘टगे’ छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करून आता शहाणपणा शिवतात! – संजय राऊत

Aprna

राहुलजी गांधींच्या प्रतिमेला जोडे मारण्याचे आंदोलन म्हणजे हीन राजकारण! – बाळासाहेब थोरात

Aprna