HW News Marathi
राजकारण

…तर देशातील जनतेचा भाजपावर विश्वास राहणार नाही। रामदेव बाबा

अहमदाबाद। देशात सध्या राममंदिराचा मुद्दा गाजत आहे. राममंदिराच्या मुद्द्यावरून भाजपावर घटक पक्षांसह हिंदू संघटना आरोप करत आहेत. यात आता योगगुरू बाबा रामदेव यांनी सुद्धा उडी घेतली आहे. सरकारने राम मंदिरासाठी लवकरात लवकर अध्यादेश काढावा, राम मंदिराची निर्मिती झाली नाही तर देशातील जनतेचा भाजपावर विश्वास राहणार नाही, असे विधान योगगुरू बाबा रामदेव यांनी केले आहे. अहमदाबाद येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते.

लोकशाहीमध्ये संसदेला खूप महत्त्व आहे. केंद्रातील भाजपा सरकार संसदेत राम मंदिराचा अध्यादेश आणू शकते आणि तो शक्य तितक्या लवकर आणावा, असे मत बाबा रामदेव यांनी व्यक्त केले आहे. कोट्यवधी जनतेला राम मंदिर हवे असून त्यांच्या श्रद्धेचा अनादर झाल्यास भाजपा विश्वास गमावून बसेल. राम मंदिर हा राजकारणाचा विषय नाही आहे त्यामुळे राम मंदिरासाठी राजकारण करू नये. तसेच जनतेने एकत्रित येऊन राम मंदिराची निर्मिती केली तर जनता न्यायालय आणि संसदेचा आदर करत नाहीत असा चुकीचा संदेश जाईल, असेही बाबा रामदेव यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय महासचिवपदी ट्रान्सजेंडर व्यक्तीची निवड

Arati More

भाजप सरकारने महाराष्ट्र अधोगतीकडे नेला- अशोक चव्हाण

News Desk

‘शाह ज्यादा खा गया’

News Desk