HW News Marathi
राजकारण

पश्चिम बंगालमधील हिंसाचारानंतर एक दिवसआधीच प्रचारबंदी घटनाविरोधी | काँग्रेस

नवी दिल्ली | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या कोलकातामधील (१४ मे) तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये हिंसाचार झाला होता. या हिंसाचारानंतर निवडणूक आयोगाने एक दिवसआधीच प्रचारबंदी लागू करण्याचा निर्णय हा घटनाविरोधी असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. तसेच काँग्रेस पुढे असे देखील आरोप केला की, यामुळे आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपध्यक्ष अमित शहा यांच्यासमोर शरणागती पत्कारली आहे का? असे अनेक सवाल काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी आज (१६ मे) घेतलेल्या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहेत.

”निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमधील निवडणूक प्रचार एक दिवस आधीच थांबवण्याचा घेतलेला निर्णय हा घटनाविरोधी आहे. तसेच निवडणूक आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आज होणाऱ्या सभा विचारात घेऊन आज रात्रीपासून निवडणूक प्रचार थांबवण्याची घोषणा केली आहे,” असा आरोप सुरजेवाला यांनी केला.

देशात निष्पक्ष निवडणूक प्रक्रिया धोक्यात आली आहे. काँग्रेसने मोदींकडून होत असलेल्या आचारसंहितेच्या उल्लंघनाचे सबळ पुरावे दिल्यानंतरही काही कारवाई झालेली नाही. तसेच मोदींचा प्रोपेगेंडा असलेल्या नमो टीव्हीवरही कारवाई करण्यात आलेली नाही, असा आरोप सुरजेवाला यांनी केला. तसेच कोलकात्यामध्ये झालेल्या हिंसाचारादरम्यान ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या मूर्तीची मोडतोड भाजपच्याच कार्यकर्त्यांनी केली, असा दावाही त्यांनी केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी अनिल परब यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Aprna

पुण्यातील कसबा मतदारसंघात ‘मविआ’कडून काँग्रेसचे रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी

Aprna

महाराष्ट्रात मोठा भाऊ कोण ?, अखेर आज होणार निश्चित

News Desk