HW News Marathi
राजकारण

सैन्य दलातील अधिकाऱ्यांनी लिहलेले पत्र राष्ट्रपतींपर्यंत पोहचलेच नाही

नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान काल (११ एप्रिल) पार परडले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडणुकीच्या प्रचारात भारतीय सैनिकांनी देशाच्या रक्षणासाठी केलेल्या कारवाईचे श्रेय राजकीय नेत्यांनी घेत असल्याचा आरोप माजी सैनिकांनी केला आहे. यासाठी १५६ माजी सैनिकांनी राष्ट्रपतींना याबाबत पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे.

मोदींनी महाराष्ट्रातील लातूरमधील औसा येथे प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बालाकोट एअर स्ट्राइक आणि पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या नावाने भाजपला मत द्यावे, असे भावनिक आवाहन नवमतदारांना केले. भाजपकडून भारतीय सैनिकांच्या बलिदानाच्या राजकारण करण्यात येत असल्याचा आरोपवर विरोधकांनी केला असल्याचे माजी सेना लष्करप्रमुख जनरल दीपक कपूर यांच्यासह १५६ निवृत्त अधिकाऱ्यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहले आहेत.

या पत्रावर माजी जनरल एसएफ रोड्रिग्स, माजी जनरल शंकर राय चौधरी, माजी जनरल दीपक कपूर आणि माजी पूर्व वायुसेना प्रमुख एनसी सूरी यांचा समावेश हैं. या पत्रात माजी लष्करी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, लष्कर किंवा सैनिक कोणत्याही पक्षाचे नाहीत. पत्रात राजकीय नेत्यांद्वारे सैन्याच्या पराक्रमाचे श्रेय घेण्याला जोरदार विरोध केला आहे.

राष्ट्रपती कोविंद यांना १०० पेक्षा अधिक सैनिकांनी पत्र लिहले आहे. या पत्रामध्ये माजी लष्करप्रमूख दीपक कपूर यांच्यासह देशाच्या तिन्ही दलांच्या ८ माजी प्रमुखांच्या स्वाक्षऱ्या आहे. या पत्रामध्ये लष्करी कारवायांचा राजकीय वापर होत असल्याची चिंता व्यक्त केली आहे. पण जे पत्र माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले आहे. ते पत्र अजऊन पोहचलेले नाही, असे राष्ट्रपती भवनच्या सुत्रांनी म्हटले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भडकलेल्या महागाईवर आणि जनतेच्या होरपळीवर भाजप नेते कधी बोलणार? 

News Desk

सरकारने अण्णांच्या जीवाशी खेळू नये | उद्धव ठाकरे

News Desk

अॅफर्मेटिव्ह अॅक्शन कायदा करा !

News Desk