HW News Marathi
राजकारण

पुढचे २४ तास महत्त्वाचे आहेत, सतर्क आणि सावध राहा !

नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकीचे निकाल लागण्यास आता काही तासांचाच अवधी शिल्लक असताना मात्र काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. राहुल यांनी म्हटले की, “पुढचे २४ तास महत्त्वाचे आहेत.सतर्क आणि सावध राहा,” असे ट्वीट करून आवाहन केले आहे. निवडणुकीचे १९ मे रोजी अंतिम टप्प्यासाठी मतदान पार पडल्यानंतर तत्पूर्वी निवडणुकीचे एक्झिट पोल जाहीर झाले होते. या एक्झिट पोलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची सत्तेत येणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

यानंतर विरोधकांनी ईव्हीएमवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी एक ट्विट केले आहे. ”पुढचे २४ तास महत्त्वाचे आहेत.सतर्क आणि सावध राहा, घाबरू नका. तुम्ही सत्यासाठी लढत आहात. खोट्या एक्झिट पोलच्या दुष्प्रचारामुळे निराश होऊ नका. स्वत:वर आणि काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवा, मेहनत वाया जाणार नाही,” असे राहुल गांधी यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारे ट्वीट केले आहे.

तसेच लोकसभा निवडणुकीचा निकाल (२३ मे ) हाती आल्यानंतर सर्व चित्र स्पष्ट होईल. परंतु मतमोजणी वेळी सर्वप्रथम व्हीव्हीपॅट मशीनमधील मतांची मोजणी करून त्याची ईव्हीएममधील मतांशी जुळणी करण्याची विरोधी पक्षांची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळून लावली आहे. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटबाबत आज (२२ मे) बोलावण्यात आलेल्या बैठकीनंतर निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. आता गुरुवारी नियोजित वेळापत्रकानुसारच मतमोजणी होणार आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

अन्य राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रातील लम्पी आजार नियंत्रणात! – राधाकृष्ण विखे-पाटील

Aprna

आता धनगर आरक्षणावरून सरकारची कोंडी ?

News Desk

हौसाबाई आठवले यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त रिपाइंच्या कार्यकर्त्यांनी वाहिली आदरांजली

News Desk