HW News Marathi
राजकारण

योगींचा अजब दावा भगवान हनुमान दलित

राजस्थान | भाजपचे स्टार प्रचारक आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अलवर जिल्ह्यातील मालाखेडा मधील एका सभेला संबोधित करताना एक अजब दावा केला आहे. देव हनुमान हे स्वतःला दलित, वनवासी आणि वंचित मानत होते. ते म्हणाले की, बजरंग बली आमच्या भारतीय परंपरेत अशी देवता आहे. जी स्वत: वनवास, निर्वासित, दलित आणि वंचित आहे. सर्व भारतीय समुदाय उत्तरपासून ते दक्षिणपर्यंत, पूर्वपासून ते पश्चिमपर्यंत सगळ्यांना जोडण्याचे काम हनुमानेने केलेले आहे. तसेच त्यांनी मतदारांना भाजपला मतदान करण्याचे आवाहन देखील केले.

दरम्यान त्यांनी सांगितले की भाजपला विजयी बनवण्यासाठी सर्वांनी ‘हनुमाना’सारखा संकल्प करणे आवश्यक आहे. यापूर्वी मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत एका रॅलीमध्ये योगी आदित्यनाथ यांनी भाजप आणि कॉंग्रेसच्या निवडणूक लढाईला ‘हनुमान’ आणि ‘अली’ च्या लढाईचे वर्णन केले होते. काँग्रेसचे वरिष्ठ नेते कमलनाथ यावर निशाना साधते भाजपचे स्टार प्रचारक म्हणाले होते, ‘तुम्ही अलीला तुमच्या जवळ ठेवा, आमच्यासाठी हनुमान पुरेसा आहे.’
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

“एखादा माणूस ‘ज्या’ दिवशी नशिबालाच स्वतःचं कर्तुत्व समजू लागतो…”, उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यावर राज ठाकरेंची टीका

Aprna

राष्ट्रपती निवडणूक २०२२ : मतपेटी सीलबंद करुन वाहनाद्वारे मुंबई विमानतळाकडे रवाना

Aprna

पंतप्रधान मोदी-भाजपला हुकूमशाही माध्यमातून सत्ता उपभोगायची आहे !

News Desk
मुंबई

अभाविपच्या संघर्षाला यश, उत्तरपत्रिका घोटाळा प्रकरणात चौकशी समितीची घोषणा

News Desk

मुंबई | मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने नियम धाब्यावर बसून खरेदी केलेल्या नवीन उत्तरपत्रिका घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करावी आणि समितीचा अहवाल येईपर्यंत संचालकांना सक्तीच्या रजेवर पाठवावेत या मागणीसाठी अभाविपचे मुंबई विद्यापीठ फोर्ट कॅम्पस मध्ये आंदोलन सुरू होते.

विद्यापीठ व मॅनेजमेंट काउन्सिलने उत्तरपत्रिका घोटाळा प्रकरणात चौकशी समितीची घोषणा अखेर(२७ नोव्हेंबर) रात्री ११ वाजता केली. सदर समिती गठित करावी म्हणून काल(२८ नोव्हेंबर) अभाविपने दुपारी १२ वाजतापासून मुंबई विद्यापीठ फोर्ट कॅम्पस येथे आंदोलन सुरू केले होते. यावेळी मुंबई विद्यापीठ मॅनेजमेंट काँसिलची बैठक सुरू होती. दरम्यान विद्यापीठाचे कुलगुरू सोबत चर्चा झाल्यानंतरही जोपर्यंत याप्रकरणाचा निर्णय होणार नाही तो पर्यंत अभाविप ठिय्या आंदोलन करणार असल्याचे त्यांना सांगितले.

अखेर रात्री ११ वाजता विद्यापीठ कुलसचिव प्रा सुनील बिरुड, डीन प्रा भांबरे, काउन्सिल सदस्य ऍड नील हेळेकर यांनी अभाविपच्या आंदोलनकारी विद्यार्थ्यांना संबोधत उत्तरपत्रिका खरेदी घोटाळा प्रकरणासाठी ५ सदस्यीय चौकशी समितीची घोषणा केली आहे. तसेच यातील दोषींवर योग्य ती कारवाई होण्याचे सांगितले. सदर निर्णय घेण्यास विद्यापीठाने खूप वेळ घेतला अशी खंत यावेळी कोंकण प्रदेश मंत्री अनिकेत ओव्हाळ यांनी व्यक्त केली. तसेच या चौकशी समिती मार्फत उत्तरपत्रिका खरेदी प्रकरणाची योग्य ती चौकशी होवून दोषींवर कारवाई होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त करत हा अभाविपच्या संघर्षाचा विजय असल्याचे ओव्हाळ यांनी सांगितले.

या आहेत अभाविपच्या मागण्या

  • विद्यापीठाच्या नियमांची पायामल्ली करत विनापरवानगी छापण्यात आलेल्या उत्तरपत्रिका प्रकरणाची उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करावी.
  • उत्तरपत्रिका घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी प्रकरणाची सखोल चौकशी होईपर्यंत आताचे परीक्षा विभाग संचालक यांना सक्तीच्या रजेवर पाठवावे.
  • रत्नागिरी येथिल फिनोलेक्स महाविद्यालयातील बनावट गुणपत्रिका तयार केलेल्या प्रकरणाची विद्यापीठामार्फत चौकशी व्हावी.
  • गेल्या सत्रातील निकालानंतर केलेल्या पुनर्मूल्यांकन प्रक्रिये दरम्यान झालेल्या जवळपास ३५ हजार विद्यार्थ्यांच्या निकालात बदल झाला तरी पेपर तपासणी दरम्यान झालेल्या चुकांची चौकशी करण्यात यावी.

Related posts

पुणे डंपरच्या धडकेत युवती ठार

News Desk

मुंबईला पावसाने झोडपले

News Desk

दक्षिण मुंबईतील फोर्ट परिसरात इमारतीला स्लॅब कोसळला, जीवितहानी नाही

News Desk