HW News Marathi
राजकारण

संविधानाला कोणताही धोका नाही- आठवले

मुंबई | महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेले संविधान जगातील सर्वश्रेष्ठ संविधान असल्याचा गौरव प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केला आहे. संविधानाला, आरक्षणाला आणि ऍट्रोसीटी कायद्याला केंद्र सरकार चे पूर्ण संरक्षण राहील याची ग्वाही प्रधानमंत्र्यांनी अनेकदा दिली आहे.मात्र तरीही विरोधकांकडून संविधानाला बदलले जाणार असल्याचा अपप्रचार केला जात आहे. विरोधकांचा अपप्रचार खोडून काढताना संविधानाला कोणताही धोका नसल्याचा जोरदार दावा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे.

संविधानाला, आरक्षणाला आणि ऍट्रोसिटी कायद्याला हात लावण्याचा प्रयत्न झाला तर त्याचा रिपब्लिकन पक्ष रस्त्यावर उतरून तीव्र विरोध करेल. जे संविधानाला धक्का देण्याचा प्रयत्न करतील त्यांचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन रामदास आठवलेंनी केले. उल्हासनगर येथील टाऊन हॉल मध्ये रिपाइंचे उल्हासनगर जिल्हा अध्यक्ष भगवान भालेराव यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सत्कार समारंभात रामदास अठवले बोलत होते.यावेळी विचारमंचावर उल्हासनगर च्या महापौर आयलानी आमदार बालाजी किणीकर, आमदार किसन कथोरे रिपाइं चे राष्ट्रीय पदाधिकारी सुरेश सावंत, बी बी मोरे, प्रल्हाद जाधव हेमंत रणपिसे घनश्याम चिरणकर आदी अनेक मान्यवर उपस्थित होते. भगवान भालेराव हे सर्वांना सोबत घेऊन रिपब्लिकन पक्ष वाढविण्याचे काम करीत असल्याबद्दल सर्व वक्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

भारताने पाकिस्तानशी लढाई केली तर पाकिस्तान शिल्लक राहणार नाही.उल्हासनगरात मोठ्या संख्येने सिंधी समाज आहे. सिंधी समाज पाकिस्तान मधून भारतात आला आहे. मेहनतीने भारतात राहणारा राष्ट्रप्रेमी सिंधी समाजाने प्रगती केली आहे. सिंधी समाजाला आरक्षण देण्याची झालेली मागणी योग्य असून त्यासाठी आपण प्रयत्न करू. ज्या समाजाला आरक्षण मिळत नाही त्या समाजांना जातींना स्वतंत्र प्रवर्ग करून आर्थिक निकषावर आरक्षण देण्यात यावे. त्यासाठी आराक्षणाची मर्यादा 75 टक्के करण्यात यावी.सामाजिक आरक्षण 50 टक्के आणि आर्थिक निकषावरील आरक्षण 25 टक्के करून त्यात मराठा, जाट, गुज्जर या जातींप्रमाणे सिंधी समाजाला ही आरक्षण देण्यात यावे.त्यामुळे अनुसूचित जातीजमाती आणि ओबीसींच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही असे रामदास आठवलेंनी स्पष्ट केले. यावेळी मोठया संख्येने रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…तब्बल दिडशे बैठका घेतल्या”, मंत्री तानाजी सावंत यांचा गौप्यस्फोट

Aprna

कश्मीरात जो हिंसाचार, दहशतवाद आणि फुटीरतावाद बोकाळला आहे त्यास एकटा सिद्धू जबाबदार नाही | ठाकरे

News Desk

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर

Aprna