HW News Marathi
राजकारण

‘आग असल्याशिवाय धूर निघू शकत नाही.’ | भाजपचे आमदार अनिल गोटे

धुळे | शेतकरी धर्मा पाटील यांनी पालक मंत्री जयकुमार रावल यांची चार वेळा भेट घेतली होती. पाटील यांना जमिनीचा योग्य मोबदला न दिल्यामुळे त्यांनी आत्महत्याचा प्रयत्न केला. या चार ही भेटीच्या वेळी पाटील यांनी रावल यांना आत्महत्या करण्याचा इशारा दिला होता. पण, रावल यांनी याकडे दुर्लक्ष केले होते. ‘आग असल्याशिवाय धूर निघू शकत नाही.’ अशा शब्दात भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी सरकारवर टीका केली.

त्यामुळे गोटे यांनी मुख्यमंत्र्यांना दोन पानी पत्र लिहून धुळ्यातील जमीन घोटाळ्याबाबात माहिती दिली आहे. ‘दलालांना राजकीय संरक्षण असल्याशिवाय जमीन घोटाळा शक्य नाही,’ असे बोलत गोटे यांनी भाजपाला घरचा आहेर दिला आहे. तसेच मागच्या सरकारच्या वाईट गोष्टी आपण का घ्यायच्या? असा सवाल देखील गोटे यांनी सरकारला विचारला आहे.

धर्मा पाटील प्रकरणात सरकारला त्यांच्या मंत्र्यांकडून सवाल विचारण्यात येते आहेत, पाटील प्रकरणात सरकारला लवकरात लवकर तिलासा मिळेल असे चित्र दिसत नाही. भाजपच्या मंत्र्याकडून आपल्याच सरकारवर टीका होत असल्यामुळे राजकीय वर्तुळात या विषयीच्या चर्चा रंगू लागली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गोव्यात नरकासुरांच्या पुतळ्याचे दहन करून नरक चतुर्दशी साजरा

swarit

मला यात काहीही चुकीचे वाटत नाही !

News Desk

स्वराज यांच्या निर्णयावर बोलले पी चिदंमबरम

News Desk