HW News Marathi
राजकारण

प्लास्टिक बंदी होण्यासाठी मानसिकता बदलणे गरजेचे !

मुंबई | “१०० टक्के प्लास्टिक बंदी होण्यासाठी मानसिकता बदलणे गरजेचे आहे आणि मानसिकता बदलण्यासाठी जागरुकता करणे गरजेचे आहे,” असे मत शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आज (१७ ऑगस्ट) घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्रदिनी लाल किल्ल्यावरून भाषण देताना २ ऑक्टोबरपर्यंत आपण प्लास्टिक बंदी होऊ, असा मुद्दा मांडत. त्यामुळे प्रत्येक नागरिकाला प्लास्टिक बंदीची विनंती करण्यासाठी शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज (१७ ऑगस्ट) पत्रकार परिषद घेत मोदींचे आभार मानले.

महाराष्ट्रात लागू करण्यात आलेली प्लास्टिक बंदी लागू झाल्यामुळे कचऱ्याच्या प्रमाणात देखील फरक पडल्याचे आदित्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. “पूर्णपणे प्लास्टिक बंदी जर केली तर त्याचा पर्यावरणावर खूप चांगला परिणाम दिसून येईल. यासाठी लवकरात लवकर कायदा येणे सुद्धा गरजेचे आहे. भारतातील २० राज्यांमध्ये प्लास्टिक बंदी लागू झालेली आहे. यामुळे महिलांना रोजगारही मोठ्याप्रमाणावर उपलब्ध झाला आहे,” असे ठाकरे म्हणाले.

तसेच रेल्वे स्थानक आणि विमानतळ प्लास्टिकमुक्त करण्याबाबत मी हरदीप सिंग यांची भेट घेतली होती. यावेळी प्लास्टिकला पर्याय म्हणून बऱ्याच गोष्टी बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. यासाठी मानसिकता बदलणे गरजेचे आहे आणि मानसिकता बदलण्यासाठी जागरुकता करणे गरजेचे आहे. यासाठी देखील प्रयत्न चालू आहेत. प्लास्टिक वापरणाऱ्यांवर कारवाई सुरू असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला अर्थसंकल्प पूर्व आढावा

Aprna

अवनी वाघिणीच्या मृत्यूनंतर कोणालाही आनंद होण्याचे कारण नाही !

swarit

Shivsena Dasara Melava 2018 | २५ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार !

News Desk