HW News Marathi
राजकारण

वायएसआर काँग्रेस-टीडीपीच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीत २ नेत्यांचा मृत्यू

नवी दिल्ली | आंध्र प्रदेशमधील अनंतपूर जिल्ह्यातील मिरपूरम येथे वायएसआर काँग्रेस आणि तेलगू देसम पक्षाच्या (टीडीपी) कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली आहे. यात टीडीपी नेते एस. भास्कर रेड्डी आणि वायएसआर काँग्रेसचे पुल्ला रेड्डी या २ नेत्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. एस. भास्कर रेड्डी हे टीडीपीचे डमी एजंट म्हणून काम करतात असा आरोप करत या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जबर मारहाण झाली.

पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचत नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला मात्र कार्यकर्त्यांकडून पोलिसांवर देखील दगडफेक करण्यात आली. एस. भास्कर रेड्डी आणि पुल्ला रेड्डी यांच्यासह दोन्ही पक्षांचे अनेक कार्यकर्ते हाणामारीत गंभीर जखमी झाले होते. या सर्वांना उपचारासाठी तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उचारादरम्यान एस. भास्कर रेड्डी आणिपुल्ला रेड्डी यांचा मृत्यू झाला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

INX Media Case : पी. चिंदबरम यांना ईडी अटक करू शकत नाही

News Desk

“आईवडिलांना शिव्या द्या चालेल, पण…” , चंद्रकांत पाटलांचे वादग्रस्त वक्तव्य

Aprna

कमांडर अभिनंदन यांची सुटका मोदींमुळे नव्हेच, मात्र त्यांनी संपूर्ण श्रेय घेतले !

News Desk