HW News Marathi
राजकारण

कोकणातून नाणारचा राक्षस घालवल्याबद्दल उद्धव ठाकरेंकडून मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन

मुंबई । कोकणातून नाणारचा विषारी राक्षस घालवल्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले आहे. “कोकणातील लोकांच्या एकजुटीचा आणि संघर्षाचा हा विजय असून अखेर सरकारला लोकभावनेचा आदर करावाच लागला”, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

“शिवसेनेने कधीही विकासाला विरोध केला नाही. मात्र, नाणारसारखे प्रकल्प हे निसर्ग, पर्यावरण, शेती, फळबागांचा विध्वंस करणारे ठरतात. त्यामुळे या प्रकल्पाच्या विरोधात कोकणची जनता उभी राहिली आणि शिवसेनेने या जनतेला साथ दिली”, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

“मुख्यमंत्र्यांनी नाणार प्रकल्प इतर ठिकाणी न्यावा. या प्रकल्पाचे इतर ठिकाणी कोणी स्वागत करत असेल तर त्याला आमचा विरोध असण्याचे काही कारण नाही. परंतु, जर जनतेचा जर या प्रकल्पाला विरोध असेल तर शिवसेना जनतेची साथ देईल”, असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“नागाला कितीही दूध पाजले तरी चावायचा तो चावतोच”, उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल

Aprna

वीर सावरकर पुन्हा दुर्दैवी ठरले ही वेदना आहेच!

News Desk

गडचिरोलीमधील एटापल्ली मतदान केंद्राजवळ आयडी स्फोट

News Desk