HW News Marathi
राजकारण

उपेंद्र कुशवाह यांची पंतप्रधान मोदींवर सडकून टीका

नवी दिल्ली | उपेंद्र कुशवाहा यांनी आज आपल्या केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. बिहारमधील एनडीए आघाडीत आपल्या पक्षाला आवश्यक तेवढे स्थान मिळत नसल्याने उपेंद्र कुशवाहा नाराज गेल्या अनेक दिवसांपासून नाराज होते. दरम्यान, यावेळी कुशवाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली आहे. ”पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बिहारमधील लोकांची अपेक्षा पूर्ण करण्यात अयशस्वी ठरले आहेत. बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्याचे केवळ आश्वासन देण्यात आले. मात्र, त्या दृष्टीने कोणतेही काम सुरु झालेले नाही. बिहार पूर्वी जसे होते तसेच आजही आहे”, अशी टीका कुशवाहा यांनी केली.

”एनडीएमधील माझा अनुभव अत्यंत वाईट आहे. बिहारच्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी मी सभांमध्ये वारंवार माझे मत मांडले. मात्र, मला असे अनेकदा भाजपकडून सांगण्यात आले कि बिहारच्या लोकांना न्याय देण्याचे काम नितीश कुमार करीत आहेत. माझ्या पक्षाला संपविण्याचा प्रयत्न कायमच भाजप आणि नितीश कुमार यांच्याकडून केला गेला”, असे कुशवाह यांनी सांगितले. आगामी लोकसभा निवडणुकीत आपल्या आरएलएसपी पक्षाला अधिक जागा मिळाव्यात ,अशी मागणी कुशवाहा यांनी केली होती. मात्र भाजपने त्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष केले होते. बिहारमधील एनडीएच्या आघाडीत संयुक्त जनता दलाने पुन्हा केलेल्या प्रवेशाने लोकसभा निवडणुकीपूर्वी एनडीएमध्ये जागा वाटपावरून संघर्ष निर्माण झाला होता. यात आपल्या योग्य स्थान न मिळाल्याने कुशवाहाअनेक महिन्यांपासून नाराज होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

इव्हीएम मशीनचा गैरवापर होतोय, नवाब मलिकांचा आरोप  

News Desk

भाजपच्या पहिल्या यादीत नाव नसूनही खडसेंकडून उमेदवारी अर्ज दाखल

News Desk

मोदीजी, तुम्ही आमच्या राष्ट्रवादालाच तर घाबरता !

News Desk
व्हिडीओ

अहमदनगरमध्ये जल्लोष करणाऱ्या कार्यकर्त्यांवर लाठीमार

News Desk

सोमवारी अहमदनगर महापालिकेच्या निवडणुकीसाठी मतमोजणी सुरु असताना मत मोजणी केंद्राबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यामुळे पोलिसांनी जोरदार लाठीमार केला. पोलिसांच्या अंगावर रंग उधळल्यामुळे हा लाठीमार केला असल्याचे सांगितले जात आहे.

मत मोजणी केंद्राबाहेर हजारो लोक जमले होते. उमेदवार निवडून येताच कार्यकर्ते जल्लोष करीत गुलाल उधळत होते. त्याचवेळी एका उमेदवाराच्या निवडीचा जल्लोष सुरु असताना कार्यर्त्यांनी उधळलेला गुलाल पोलिसांच्या अंगावर पडला. त्यामुळे पोलिसांनी जोरदार लाठीमार केला. लाठीमार होताच जमावाने मिळेल त्या दिशेने धूम ठोकली. या लाठीमारात काहीजण जखमी झाल्याची माहीती आहे.

Related posts

गणेश नाईक बलात्कार प्रकरण : काय घडलं आज कोर्टात?

News Desk

राष्ट्रवादीच्या दत्तात्रय भरणेंची कॅालर महिलेने का पकडली? वायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

News Desk

धनंजय मुंडेंवर आरोप करणाऱ्या रेणु शर्माने मलाही त्रास दिला,भाजप नेत्याचा गौप्यस्फोट!

News Desk