HW News Marathi
राजकारण

#Vidhansabha2019 | येत्या ८ तारखेला दसरा मेळाव्यात सर्व काही बोलेन !

मुंबई | “जरा थांबा. उमेदवारी अर्ज भरुन होऊ द्या. अजूनही निर्णय प्रक्रिया सुरु आहे. मी शिवसेनेच्या परंपरेप्रमाणे येत्या ८ तारखेला दसरा मेळाव्यात सर्व काही बोलेन”, असे सूचक वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे. आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेनेकडून आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अनेक इच्छुकांमध्ये नाराजी नाट्य सुरु झाले आहे. शिवसेनेत एकीकडे पक्षप्रमुख तर दुसरीकडे बंडखोरी दिसून येत आहे. या संपूर्ण पार्श्वभूमीवर, आता पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले आहे. काँग्रेसचे विधानपरिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी यांच्या शिवसेना प्रवेशादरम्यान उद्धव ठाकरे बोलत होते.

शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे देखील वरळी मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणूक लढविणार आहे. काहीच दिवसांपूर्वी स्वतः आदित्य ठाकरे यांनी वरळीतील मेळाव्यात याबाबतची घोषणा केली होती. त्याचप्रमाणे, सोमवारी (१ ऑक्टोबर) शिवसेनेकडून आदित्य ठाकरे यांना एबी फॉर्म देखील देण्यात आला आहे. याच अनुषंगाने आदित्य ठाकरे हे निवडणूक लढविणारे ‘पहिले ठाकरे’ ठरणार आहेत. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यावेळी बोलत होते. “आदित्य हा माझ्यापेक्षाही जास्त मेहनत करत आहे. सेवा करण्याची ठाकरे घराण्याची परंपरा आहे. फक्त आदित्यच नव्हे तर देशातील तरुणांनी पुढे येऊन देश घडवला पाहिजे”, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

आज शरद पवार घेणार सातारा मतदारसंघाच्या उमेदवारीचा निर्णय

News Desk

औरंगाबादेत आठवलेंच्या भाषणाल विरोध

swarit

चार वर्षानंतर भाजपला शिवसेनेची ताकत कळाली | संजय राऊत

News Desk