HW News Marathi
राजकारण

आम्ही आता राम मंदिरासाठी आणखी वाट पाहू शकत नाही !

नवी दिल्ली | “आम्ही आता राम मंदिरासाठी आणखी वेळ वाट पाहू शकत नाही”, असे वक्तव्य विश्व हिंदू परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष आलोक कुमार यांनी केले आहे. राम मंदिराच्या मुद्द्यांबाबत विष हिंदू परिषदेकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. काँग्रेसमुळेच राम मंदिराचा मुद्दा खितपत पडला, असा आरोप यावेळी विश्व हिंदू परिषदेकडून करण्यात आला आहे.

“अयोध्या राम मंदिरासाठी हिंदू आग्रही आहेत. संत समाज आणि सामान्य जनतेचा आम्हाला पाठिंबा आहे. आता सरकारने कोणत्याही प्रकारचा विलंब न करता राम मंदिरासाठी लवकरात लवकर कायदा करावा”, अशी मागणी देखील यावेळी विश्व हिंदू परिषदेकडून करण्यात आली आहे

गेल्या अनेक दिवसांपासून अयोध्या राम मंदिराच्या मुद्द्यावरून देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून आणि लोकांच्या तीव्र धार्मिक भावना ओळखून प्रत्येक राजकीय पक्षाकडून राम मंदिराच्या मुद्द्याचा आपल्या मतांच्या राजकारणासाठी केवळ वापर केला जात असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एमपीएससी आणि बीएड सीईटी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना बॅच बदलण्याचा पर्याय देणार! – चंद्रकांत पाटील

Aprna

आंबेडकरांचा गेम प्लॅन नेमका काय हे आम्हाला कळत नाही ! 

News Desk

राहुल गांधी म्हणाले तर वाराणसीमधून निवडणूक लढवेन ! 

News Desk