HW News Marathi
राजकारण

राफेल प्रकरणी मोदींना क्लिन चिट देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत

मुंबई | राफेल करार प्रकरणी करण्यात आलेल्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना क्लिन चिट दिली आहे. केंद्रसरकार विरुद्ध राफेल कारारावरून आरोपांचे कितीही वाकयुद्ध काँग्रेसने संसदेत छेडले होते. तरी अंतिम विजय हा सत्याचाच असतो याची प्रचिती आज सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे अली असल्याचे सांगत या निर्णयाचे स्वागत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.

नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांत काँग्रेस ने राफेल बाबत केंद्र सरकारवर खोटे आरोप करीत धुरळा उडविला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निर्णयाने आरोपांची ही धूळ खाली बसली असून सत्य समोर आले आहे.नरेंद्र मोदींचे सरकार भ्रष्टाचार विरहित निष्कलंक असून आगामी काळात लोकसभा निवडणुकांत काँग्रेस च्या खोट्या प्रचाराला जनता बळी पडणार नाही. भ्रष्टाचाराचा एकही डाग नसलेल्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदींवर जनतेचा आजही विश्वास असल्याचे प्रतिपादन रामदास आठवले यांनी केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

ईशान्य मुंबईसाठी सोमय्यांऐवजी मनोज कोटक यांच्या नावाची चर्चा

News Desk

लोकसभा निवडणूक मोदी-शहा विरुद्ध देश अशी आहे !

News Desk

विदर्भाच्या विकासाचा हा झपाटा पाहता स्वतंत्र विदर्भ मागण्याची गरजच राहिली नाही !

News Desk
राजकारण

राफेलबाबतच्या निर्णयाचे राम मंदिर कनेक्शन

News Desk

नवी दिल्ली | राफेल करारात कोणतीही अनियमितता नाही, असे स्पष्ट करून सर्वोच्च न्यायालायने आज (१४ डिसेंबर) राफेल कराराची चौकशीची मागणी करणाऱ्या सर्व याचिका फेटाळून लावल्या आहेत. दरम्यान, या प्रकरणी प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या निर्णयाचा अयोध्या राम मंदिराच्या मुद्द्याशी अजब संदर्भ लावला आहे. “सर्वोच्च न्यायालयाने राफेल विमान खरेदी कराराबाबत काहीही चुकीचे सांगितले नाही. राफेलची किंमत ठरविणे हे जसे न्यायालयाचे काम नाही. तसेच राम मंदिराचा निर्णय घेणेही न्यायालयाचे काम नाही”, असा खोचक टोला संजय राऊत यांनी म्हटले आहे.

“राफेल विमानांची किंमत ठरविणे हे न्यायालयाचे काम नाही. राफेल प्रकरण हे संसदेत सोडविले जाऊ शकते”, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे. केंद्र सरकार खरेदी करत असलेल्या १२६ लढाऊ विमान खरेदी प्रक्रियेत न्यायालय हस्तक्षेप करू शकत नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. सरकारच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे योग्य नाही. राफेल करारासंदर्भात प्रत्येक लहान लहान गोष्टींची पडताळणी करणे न्यायालयाला शक्य नाही, असेही सर्वोच्च न्यायालायने स्पष्ट केले आहे.

राफेल विमान खरेदी करारात कोणतीही अनियमितता नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. यानंतर “राफेल कराराची माहिती राहुल गांधींना कशी मिळाली याबाबतची माहिती त्यांनी सर्वांना द्यावी”, असे म्हणत भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीना कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. “यापुढे राहुल गांधींनी असे बालिश आरोप करू नयेत”, असा टोलाही अमित शाह यांनी लगावला आहे.

राफेल विमान कराराला विरोध करत कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधीसह कॉंग्रेस पक्षाने मोदी सरकारला वेठीस धरले होते. रिलायन्स कंपनीला विमान निर्मिती क्षेत्राचा कोणताही अनुभव नसताना त्यांना राफेलचे कंत्राट दिल्याने राहुल गांधीकडून भाजप सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. एवढेच नव्हे तर राफेल कराराच्या खरेदीची संपूर्ण चौकशी झाली तर पंतप्रधान मोदींना तुरुंगात जावे लागेल, असेही काँग्रेसकडून सांगण्यात येत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचा विश्वासघात केल्याचा आरोप देखील राहुल गांधींनी म्हटले होते.

Related posts

गुजरातचे पंतप्रधान मोदी, फडणवीस मटका एजंट – राज ठाकरे

News Desk

“मी महाराष्ट्राच्या विकासाचे कंत्राट घेतलेय” उद्धव ठाकरेंच्या टीकेला मुख्यमंत्र्यांचे सडेतोड उत्तर

Aprna

“पुन्हा एकदा महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन झाले, तर…,” संजय राऊतांचे संकेत

Aprna