HW News Marathi
क्रीडा

तिरुवनंतपुरममध्ये भारतीय क्रिकेट संघाचे मोठ्या उत्साहात स्वागत

नवी दिल्ली | तिरुवनंतपुरममध्ये भारत आणि वेस्ट इंडिजचा निर्णायक सामना होणार आहे. या सामन्यासाठी तिरुवनंतपुरम येथे दाखल झालेल्या भारतीय क्रिकेट संघाचे आज चाहत्यांकडून मोठ्या उत्साहात स्वागत झाले आहे. तिरुवनंतपुरम येथे खास पारंपरिक पद्धतीने ढोल वाजवत भारतीय संघाचे स्वागत करण्यात आले. भारतीय संघाने तिरुवनंतपुरम येथील हा निर्णायक सामना जिंकला तर भारताला ही मालिका जिंकता येणार आहे.

भारत-वेस्ट इंडिजच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय क्रिकेट संघ विजयी झाला होता. मात्र दुसऱ्या सामन्यात कर्णधार विराट कोहलीच्या दमदार कामगिरी नंतरही भारताला विजय मिळविता आला नव्हता. पुणे येथे झालेल्या तिसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजने भारतावर विजय मिळवत मालिकेत १-१ अशी बरोबरी केली होती. तर मुंबईत झालेल्या चौथ्या सामन्यात भारताने पुन्हा वेस्ट इंडिजला हरवून मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गौतम गंभीर भाजपाकडून खेळणार का ?

swarit

प्रणव धनावडेचा विश्वविक्रम आता सीबीएसईच्या पाठ्यपुस्ताकात

swarit

Asia Cup 2018 | विराट ऐवजी रोहित शर्मा करणार नेतृत्त्व

News Desk