HW News Marathi
क्रीडा

ई-स्पोर्ट्स स्पर्धेत मुंबईची सिग्निफाय पुढच्या फेरीत  

मुंबई |अल्पावधीत तरूण वर्गात अतिशय लोकप्रिय ठरलेला कॉबेक्स मास्टर्स २०१८ या ऑनलाइन गेमिंग स्पर्धेत मुंबईचा सिग्निफाय संघ आणि इब्राएन्स स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात दाखल झाले आहेत. मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकत्ता, पुणे, बेंगळुरु, हैद्राबाद, अहमदाबाद, जयपूर आणि कोहिमा या दहा शहारांत स्पर्धेचा पहिला टप्पा पार पडला आहे.

त्यानंतर दुसरा टप्पा आणि आंतराष्ट्रीय स्पर्धकांबरोबर अंतिम फेरी रंगणार आहे. एक कोटी रुपयांच्या बक्षीस रकमेची ही स्पर्धा सीएस: गो आणि डोटा-२ या गटांत होत आहे. या स्पर्धेत पहिल्या टप्प्यातून दुसऱ्या टप्पात दाखल झालेल्या विजेत्या संघाला ३० हजार तसेच पदक तर उपविजेत्या स्पर्धकांना २० हजार रुपये तसेच पदक बक्षिस स्वरूपात देण्यात आले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

नदालचा पराभव करत जोकोविचने जिंकले ऑस्ट्रेलियन ओपन

News Desk

आयपीएल सट्टाप्रकरण, अरबाजला ठाणे पोलिसांचे समन्स

News Desk

मणिपूरमधील शेतकऱ्याच्या मुलाने पटकावले पहिले सुवर्णपदक

Gauri Tilekar
शिक्षण

भगवद्‌गीता वाटपाचे परिपत्रक मागे ?

News Desk

मुंबई | मुंबईतील सर्व अशासकीय अनुदानित महाविद्यालयांना भगवतगीता वाटपाचे परिपत्रक मागे घेण्याचे आश्वासन मुंबईच्या उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. रोहिदास काळे यांनी छात्र भारती विद्यार्थी संघटनेला आज दिले आहे. उच्च शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे मुंबईतील विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या होत्या. त्यामुळे गुरुवारी भगवतगीतेचे वाटप त्वरीत बंद करण्यात आले आहे, असे सहसंचालक डॉ रोहिदास काळे यांनी मुंबईतील विद्यार्थी संघटनांना सांगितले.

नॅक मुल्यांकन प्राप्त महाविद्यालयांना भगवत गीता या धार्मिक ग्रंथाचे विद्यार्थ्यांना वाटप करण्याचे आदेश उच्च शिक्षण संचालयाने दिले होते. याबाबतच्या सूचना संबंधित महाविद्यालयांना देण्यात आल्या होत्या. त्यावर आक्रमक पवित्रा घेत महाराष्ट्रातील विद्यार्थी संघटनांनी मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री यांच्याकडे निषेध नोंदविला होता. संबंधित प्रकरणाबाबत या संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

या बाबत बोलताना मुंबई छात्रभारतीचे अध्यक्ष सचिन बनसोडे म्हणाले, धर्मग्रंथाला विरोध असण्याचे कारण नाही. धर्म ही एक सभ्यता आहे आणि प्रत्येकाने ती खाजगीबाब म्हणून पाळावी. सार्वजनिक ठिकाणी तीचे प्रदर्शन करु नये. भगवतगीतेलाही विरोध असण्याचे कारण नाही. त्यातील भल्याबुऱ्या गोष्टींवर अनेक शतके चर्चा सुरु आहे, सुरु राहील. परंतु या वादात सरकारने पडू नये. तसेच कुठल्या एका धर्माच्या कट्टरवाद्यांना खुश करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या आयुष्यांशी आणि घटनेच्या अस्तित्वाशी खेळू नये, असा खोचक इशारा छात्र भारतीचे मुंबई अध्यक्ष सचिन बनसोडे यांनी शिक्षण विभागाला दिला.

Related posts

महिला वॉर्डननेच केला विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार

swarit

विना अनुदानित दिव्यांग शाळांच्या शिक्षकांचे आमरण उपोषण

News Desk

माजी सैनिकांच्या दोन पाल्यांना शिक्षणासाठी १२ हजार रुपयाची आर्थिक मिळणार

News Desk