HW News Marathi
क्रीडा

सिंधूने देशाची मान उंचावली

चीन | बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने वर्ल्ड टूर फायनल्सचे अजिंक्यपद मिळविले आहे. वर्ल्ड टूर फायनल्समध्ये जिंकणारी सिंधू पहिलीच भारतीय बॅडमिंटनपटू ठरली आहे. २०१८ मध्ये सिंधूचे हे पहिले अजिंक्यपद ठरले आहे.

अंतिम फेरीत सिंधूने नोझोमी ओकुहारावर मात केली आहे. २१-१९, २१ -१७ ने सिंधूने आपला अंतिम फेरीचा सामना जिंकला आहे. मागच्या मोसमात ओकुहाराने वर्ल्ड चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये सिंधूचा पराभव केला होता. सदर विजेतेपद पटकावून सिंधूने २०१८ च्या खेळाचा शेवट सुवर्णपदकाची कमाई करत केला आहे. या दोघांमध्ये एकूण १३ मॅच झाल्या आहेत. यामध्ये ७ मॅचमध्ये सिंधूचा विजय झाला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

पाकिस्तान-न्यूझीलंड एकदिवसीय सामन्यात नेमके काय घडले ?

swarit

कपिल देव यांनी केली समीक्षा, भारताच्या संघाचा का झाला पराजय

News Desk

धोनी भाजपमध्ये प्रवेश करणार ?

News Desk
राजकारण

प्रयागराजमध्ये सर्व भाविक अक्षयवट आणि सरस्वती स्तंभाचे दर्शन करू शकणार !

News Desk

प्रयागराज | देशातील न्यायव्यवस्थेवर दबाव आणला जात असून याबाबत देशाला आणि तरुणांना सावध करण्याची वेळ आल्याची टीका पंतप्रधान मोदी यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रयागराजमध्ये कुंभच्या यशस्वी आयोजनाबद्दल गंगेच्या किनाऱ्यावर पूजा केली. यानंतर विविध विकासकामांचे उद्घाटन केले. यावेळी सभेला संबोधित करताना ते बोलत होते. प्रयागराजमध्ये सर्व भाविक अक्षयवट आणि सरस्वती स्तंभाचे दर्शन करू शकणार असल्याची घोषणा यावेळी पंतप्रधान मोदींनी केली.

यावेळी त्यांनी देशाला सावध करत असल्याचेही सांगितले. सर्वाधिक वेळ सत्तेत राहिलेला पक्ष आज देशाच्या स्वायत्त संस्थांना एका पक्षाच्या समोर हात जोडून उभे करण्याच्या प्रयत्नात आहे. हा पक्ष सर्व मर्यादा सोडून आहे. न्यायव्यवस्थेला सत्तेत राहून लटकवत ठेवतात आणि सत्ता गेली धमकावण्याचे काम करतात. केशवानंद प्रकरणात सर्वाच वरिष्ठ न्यायाधीशांना सरन्यायाधीश बनविण्यात आले नाही. न्यायाधीश खन्ना यांच्या ज्येष्ठतेकडे डोळेझाक करण्यात आल्याचा आरोपही मोदी यांनी केला.

 

 

Related posts

“मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला प्रवासात स्पेशल प्रोटोकॉल नको,” मुख्यमंत्र्यांचे आदेश

Aprna

तुम्ही अनेक वर्षे दबावतंत्राचा वापर केला, परंतु रावणराज जास्तकाळ चालत नाही !

News Desk

संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर 2 नोव्हेंबर रोजी होणार सुनावणी

Aprna