HW News Marathi
Uncategorized

आंबेडकर नगरातील अवैद्य देशीदारूसह कुंटनखाना विरोधात महिलांचा एल्गार

विनोद तायडे

वाशिम येथील डॉ आंबेडकर नगरातील अवैध देशीदारू व कुंटनखाना बंद करण्यासाठी महिलांनी एल्गार पुकारला आहे. याबाबत जेष्ठ पत्रकार मंगलदादा इंगोले यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षकाना निवेदन देण्यात आले .

हिंगोली येथील लता सुनिता या आंटीनी वाशिम येथील डॉ आंबेडकर नगरात बस्तान बसविले आहे. गुंडांच्या भरवशावर अवैध देशीदारू आणि देह विक्री चा अड्डा बनविला आहे . या नगरातील महिला व विद्यार्थिनींना आंबट शौकीन आणि दारुड्याचा अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. लता-सुनीता दारू पिऊन जनतेला अश्लील व जातीवाचक शिवीगाळ करतात .युवकांनी याला विरोध केल्यास त्यांचे पाळलेले गुंड चालू तलवारी घेऊन हल्ला करतात. नगरात त्यांनी दहशत पसरविली आहे. सुनीता व लता ह्या दोघी युवकाविरोधात पोलीस स्टेशनला खोटे गुन्हे दाखल करत असल्याने त्यांचे भविष्य उध्वस्त होत आहे . या नगरात राहणाऱ्या कित्येकांचा संसार उध्वस्त झाला आहे .पोलीस व लता-सुनीता चे मधुर संबंध असल्याने पोलीस कार्यवाही करत नसल्याचा आरोप महिलानी केला आहे अवैध देशीदारू आणि अवैध देह विक्रीचा व्यवसाय बंद करण्यासाठी शेकडो महिला जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडकल्या अवैद्य व्यवसाय बंद न केल्यास महिलानी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनातून दिला आहे

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

खड्डेमुक्त रस्त्यांसाठी टास्क फोर्सची निर्मिती!

News Desk

राज ठाकरेंनी देशपांडे, सरदेसाईंना का पुढे आणलं नाही?, शिवसेनेचा सवाल

Aprna

अभिनेता सुशांतच्या पार्थिवावर दुपारी ३ वाजता मुंबईत होणार अंत्यसंकार

News Desk
मुंबई

मालगाडी घसरल्याने नाशिक, मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा

News Desk

कसारा- कसारा रेल्वेस्थानकाजवळ मालगाडीचे डबे घसरल्याने नाशिक तसेच मुंबईकडे जाणाऱ्या बहुतांश रेल्वे रखडल्या असून विकेंडला घरी जाणाऱ्या चाकरमान्यांचा मोठा खोळंबा झाला आहे. कसाऱ्याजवळ मालगाडीच्या डबे घसरण्याच्या घटनेमुळे मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसहून कसारा स्टेशन गाठणाऱ्या प्रवाशांचे चांगलेच हाल सुरू आहेत. घसरलेले डब्बे रुळावर आणण्याचा युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे.

Related posts

शिक्षकाने केला विद्यार्थींनीचा विनयभंग

News Desk

पुणे – सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू तर सहा जण जखमी

News Desk

ऑफिस मध्ये डेस्क योगा

swarit