HW News Marathi
Uncategorized

मुंबई विद्यापीठाचे निकाल पाच दिवसांत लावतो

अतुल चव्हाण

मुंबईः मुंबई विद्यापीठातील तृतीय वर्षाचे रखडलेले निकाल येत्या पाच दिवसांत लावतो, असे आश्वासन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले आहे. दरम्यान, निकालाला दिरंगाई का झाली, याबाबत बोलणे त्यांनी टाळले.

राज्यपाल विद्यासागर राव यांनी विद्यापीठातील निकाल ३१ जुलै पूर्वी लागले पाहिजेत, असे निर्देश दिले होते. मात्र, ही मुदत जवळ आलेली असतानाही उत्तरपत्रिका तपासण्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. मुंबई विद्यापीठात निकाल लागण्यास उशीर झाल्याचा मुद्दा शिवसेनेने परिषदेत उचलून धरला. याबाबत विधानसभेत बोलताना विनोद तावडे म्हणाले,की मुंबई विद्यापीठातील कला व वाणिज्य शाखेच्या ३ लाख ७५ हजार, ‘लॉ’च्या सुमारे ४० हजार उत्तर पत्रिका तपासायच्या आहेत. व्यस्थापन विद्याशाखेच्या २८ हजार उत्तर पत्रिका तपासणे बाकी आहे. लॉ, वाणिज्य व व्यवस्थापनविषयाच्या उत्तरपत्रिका तपासणे जिकरीचे झाल्याची त्यांनी कबुली दिली. एकाही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, यासाठी काम करण्यात येत असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मोठी बातमी! ‘फेसबुक’ने बदललं आपलं नाव, लोगोतही बदल; जाणून घ्या कारण

swarit

रेराची नोंदणी नसेल तर कर्ज नाही

News Desk

कोरोनामुक्त धनंजय मुंडेंचं वर्क फ्राॅम होम सुरू , होम क्वारंटाईन असलो तरी काम थांबत नाहीत !

Arati More
Uncategorized

ग्रामीण भागातही एनसीसीची विस्तार-सुभाष भामरे

News Desk

नवी दिल्ली: येत्या काही दिवसांत एनसीसीचा (नॅशनल कॅडेड कॉर्प) देशभरातील ग्रामीण भागात विस्तार केला जाणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा केंद्राय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी नवी दिल्ली येथील कार्यक्रमात केली. एनसीसीच्या पन्नासाव्या सल्लागार समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. सध्या देशभरात १२ लाख एनसीसीचे छात्र असून त्याची संख्या १५ लाखांवर नेली जाणार आहे. एनसीसी अधिक प्रबळ करण्यावर यापुढे भर देणार असल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

Related posts

भाषांतरामुळे ज्ञाननिर्मितीमध्ये भर पडते – डॉ. माया पंडित          

News Desk

Aprna

याचिका हायकोर्टानं फेटाळली, प्रवीण दरेकर यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं

swarit