HW News Marathi
Uncategorized

जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या २४ तासांत ९ दहशतवाद्यांना कंठस्नान, भारतीय सैन्याला मोठे यश

श्रीनगर | कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात २१ दिवसांचा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. लॉकडाऊनदरम्यान देशातील जनतेने घराबाहेर पडू नये, असे केंद्र आणि राज्य सरकार वारंवार आवाहन करत आहेत. तर दुसऱ्या बाजुला आज (५ एप्रिल) जम्मू-काश्मीरच्या सीमारेषेवर पाकिस्तानच्या दहशवाद्यांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय सैन्य काश्मीरमध्ये विविध भागा गेल्या २४ तासात झालेल्या कारवाईत ९ दशदवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले.

भारतीय सैन्यांनी केरन सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ पाच तर दक्षिण काश्मिरमधील बाटपुरा येथे चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. काश्मीरमधील ९ पाकिस्तानी दहशतवाद्यांनी खात्मा केल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थने दिली आहे. काश्मीर खोऱ्यात पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. मात्र, ९ दशतवाद्यांचा खात्मा करत पाकिस्तानच्या भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिले आहे. या चकमकीदरम्यान एक जवान शहीद झाला असून इतर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी जवानांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राहुल गांधी देशाचे नेतृत्व करण्यासाठी सक्षम: शिवसेना

News Desk

गांधींच्या हत्येचे समर्थन करणाऱ्या उमेदवारांचा विजय ही देशासाठी चिंतेची बाब !

News Desk

शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया दोन ते तीन महिन्यात पूर्ण करणार !

News Desk