HW News Marathi
Uncategorized

पराभवानंतर राज बब्बर यांनी दिला उत्तर प्रदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा

लखनौ | लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यामुळे पक्षात मोठी उलथापालथ होण्यास सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत उत्तर प्रदेश फक्त एकच जागा मिळाल्याने पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राज बब्बर यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत त्यांच्या पदाचा राजीनामा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पाठविला आहे. बब्बर पाठोपाठ अमेठीत राहुल गांधी यांच्या पराभवनंतर येथील जिल्हा अध्यक्ष योगेश मिश्रा यांनी देखील त्यांचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे पाठविला आहे. तसेच ओडिशात विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या अपयशाचे कामगिरीनंतर प्रदेशाध्यक्ष निरंजन पटनायक यांनी राजीनामा आहे.

उत्तर प्रदेशात काँग्रेसला केवळ एक जागा मिळाली. फतेहपूर सीकरी येथून काँग्रेसचे उमेदवार राज बब्बर यांना पराभवाचा सामना करावा लागला. भाजपचे उमेदवार राजकुमार चाहर यांनी राज बब्बर यांचा तीन लाखांहून अधिक मतांनी पराभव केला. पक्षाने अगोदर राज बब्बर यांना मुरादाबाद येथून उमेदवारी दिली होती. मात्र, त्यांनी येथून निवडणूक लढविण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांना मुरादाबाद येथून निवडणूक रिंगणात उतरविले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

नॅशनल स्टॉक एक्स्चेंजची पीएम केअर्स फंडाला २६ कोटींची मदत

News Desk

बी.फार्म करणाऱ्या विद्यार्थ्यांना कमवा आणि शिका तत्वावर मेडिकल दुकानात काम करता येणार

News Desk

भारतामध्ये वटवाघळांमुळे कोरोना आला नाही किंवा पसरला नाही…

News Desk