HW News Marathi
Uncategorized

आरोग्याचा विषय सोडला तर काहीच महत्त्वाचा अजेंडा नसताना अट्टाहास का?

मुंबई | राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांचा लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. देशात संचारबंदी असून, जनजीवन ठप्प झाले आहे. कोरोनाला आळा घालायचा असल्यास गर्दी करणे टाळायला हवे. गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने सरकारने तातडीने हे पाऊल उचलले. मात्र, या सगळ्या चिंताजनक वातावरणातही सरकार आपले काम करतच आहे. कोरोनाच्या या वातावरणात मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक ३१ मार्च रोजी बोलावण्यात आली आहे. त्यावरून ‘मुंबई महापालिकेच्या स्टँडिंगमध्ये कसले अंडरस्टँडिंग सुरू आहे?,’ असा प्रश्न विरोधी पक्ष नेते आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.

राज्यात लागू केलेला लॉकडाऊन निदर्शनास आणून देत आशिष शेलार यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना पत्र पाठवले आहे. ‘कर्फ्युत मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक का घेतली जात आहे? एखादा आरोग्याचा विषय सोडला तर काहीच महत्त्वाचा अजेंडा नसताना हा अट्टाहास का? आता पुन्हा ३१ मार्चला बैठक कशासाठी? सगळे जग कोरोनाच्या विरोधात लढत असताना पालिकेच्या स्टँडिंगमध्ये कसले अंडरस्टँडिग सुरु आहे?,’ असा प्रश्न शेलार यांनी उपस्थित केला आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

स्वारातीमविची एम.फिल. प्रवेशपूर्व परीक्षा ५ मार्चला

News Desk

जयंत पाटलांच्या बडबडीकडे शहारूखचे दुर्लक्ष

News Desk

Bachhu Kadu यांच्या ऐवजी ‘या’ आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार?

Manasi Devkar