HW News Marathi
Uncategorized

दिलेल्या शब्दाचे कौतुक फडणवीस तुम्हाला कधीपासून झाले ?

नागपूर | “दिलेल्या शब्दाचे कौतुक फडणवीस तुम्हाला कधीपासून झाले?,” असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला. “वडिलांना दिलेला शब्द पाळण्यासाठी मी कोणत्याही थराला जाईन, मी त्या थराला गेलो आणि करून दाखवले. भाजपची पालखी कायम वाहणार नाही, हाही शब्द बाळासाहेबांना दिला होता,” याची सुद्धा आठवण उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना करून दिली आहे.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, “भाजपचे ओझे आता आम्ही उतरवून टाकू. चहापेक्षा किटली गरम असे कुणीतरी म्हणाले. मात्र, किटली पुसणारे फडके पण गरम होऊ लागले आहे.” मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा आज (१९ डिसेंबर) चौथा दिवस आहे. तर यावेळी राज्यपालांच्या अभिभाषणातील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या प्रत्येक टीकेला प्रत्युत्तर दिले.

राज्यावर कर्जाचा मोठा डोंगर आहे. तर देशाची आर्थिक स्थिती कोमामध्ये आहे. मेक इन इंडियात किती करार झाले? गुंतवणूक आली पण पुढे काय झाले?, इतर देशातील हिंदू घ्या, पण त्यांना ठेवणार कुठे, निर्वासितांची काळजी वाहणार कोण?, असे अनेक प्रश्न उद्धव ठाकरेंनी विरोधकांना केले आहेत. सीमाभागातील मराठी बांधव इतके आक्रोश करत आहेत, तुमचे सरकार असताना तुम्ही काय केले?, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर तोफ डागली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

यंदाच्या आर्थिक वर्षात देशाचा विकास दर सात टक्क्यांनी वाढेल, अहवाल संसदेत सादर

News Desk

दर्जाहीन कृषी महाविद्यालयांवर कारवाई होणे आवश्यक – राज्यपालांचे कृषी विभागाला निर्देश

News Desk

…अन्यथा धनंजय मुंडेंच्या दारासमोर आत्मदहन करेन, संतप्त पीडितेचा इशारा

News Desk