HW News Marathi
Uncategorized

ग्राहकांच्या खिशाला पुन्हा झळ, गॅसचे दर वाढले

नवी दिल्ली: स्वयंपाकाच्या गॅससिलिंडरमध्ये बुधवारी दरवाढ झाली असून विनाअनुदानित सिलिंडर ९३ रुपयांनी तर अनुदानित सिलेंडर साडेचार रुपयांनी महागले आहे. गॅसची किंमत दर महिन्याला वाढवून त्यावरील अनुदान संपवण्याचा सरकारने निर्णय घेतल्यानंतर किमतीत करण्यात आलेली ही १९ वी दरवाढ आहे. प्रत्येक कुटुंबाला वर्षांला १४.२ किलो वजनाचे १२ सिलिंडर अनुदानित दराने मिळू शकतात. त्यानंतर मात्र बाजारभावाने सिलिंडर विकत घ्यावे लागते. अनुदानित गॅसच्या १४.२ किलोग्रॅम वजनाची किंमत ४.५० रुपयांनी वाढवण्यात आल्यामुळे दिल्लीत आता हे सिलिंडर ४९५.६९ रुपयांना मिळेल. विनाअनुदानित किंवा बाजारभावाने मिळणाºया घरगुती गॅसच्या सिलिंडरची किंमतही ९३ रुपयांनी वाढवण्यात येऊन ती ७४२ रुपये करण्यात आली आहे. यापूर्वी १ आॅक्टोबरला झालेल्या दर पुनर्निर्धारणात ही किंमत ५० रुपयांनी वाढवून ६४९ रुपये करण्यात आली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

उदयनराजे राजीनामा देणार?, एका वाक्यात मोठं विधान

News Desk

राष्ट्रगीतासाठी उभे राहण्यात काय गैर: गौतम गंभीर

News Desk

रवी शास्रींच्या नावाला सर्वाधिक पसंती

News Desk
Uncategorized

भगवा दहशतवाद देशात सक्रीय

News Desk

चेन्नई – कमल हसन हे दक्षिणेतले अमिताभ…ते सध्या अभिनयातून राजकारणात येवू पहात आहेत. त्या पार्श्वभूमिवर त्यांनी हिंदू दहशतवादावर केलेलं भाष्य बोलकं आहे. त्यांच्या या भाष्यानं खळबळ उडाली आहे.

उजव्या विचारसरणीच्या लोकांनी बळाचा वापर करायला सुरुवात केली आहे. हे लोक हिंसाचारात सहभागी असून हिंदुत्ववादी संघटनांमध्ये दहशतवाद घुसला आहे’, असा थेट आरोप कमल हसन यांनी केला आहे.

तामिळ भाषेतील साप्ताहिकात कमल हसन यांनी हा स्फोटक लेख लिहिला आहे. ‘हिंदू दहशतवाद अस्तित्वात नाही, असं कोणीच म्हणणार नाही. यापूर्वी हिंदुत्ववादी चर्चा करण्यावर विश्वास ठेवायचे. पण आता ते हिंसाचारातही सहभागी होऊ लागले आहेत’, असं सांगतानाच ‘जनतेचा सत्यमेव जयते’वरील विश्वास उडाला आहे’, असंही त्यांनी लेखात म्हटलं आहे. ‘तामिळनाडूच्या तुलनेत केरळ सरकारने धार्मिक हिंसाचार चांगल्या पद्धतीनं हाताळला आहे’, असं सांगत त्यांनी केरळ सरकारचं कौतुकही केलं आहे.

कमल हसन यांच्या या लेखावर तामिळनाडूत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी हसन यांना अत्यंत कठोर शब्दांत लक्ष्य केलं आहे. ‘कमल हसन हे नैतिकदृष्ट्या भ्रष्ट आहेत. हिंदू दहशतवादा’चा कोणताही पुरावा नाही,’ असं स्वामी यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता नवा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Related posts

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात डॉक्टरांनी मांत्रिका बोलावले, रूग्ण महिलेचा मृत्यू

News Desk

निरव मोदींकडे पासवर्ड असल्याने मुंबईतील पंजाब नॅशनल बँक सील

News Desk

Bhima Koregaon : नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये !

News Desk