HW News Marathi
Uncategorized

#NirbhayaCase : सर्वोच्च न्यायालयाने आरोपी मुकेशची याचिका फेटाळली, फाशीचा मार्ग मोकळा

नवी दिल्ली | निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपी मुकेश कुमार सिंह यांचा दया याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. यानंतर आरोपी मुकेशच्या फाशीचा मार्ग मोकळा झाला आहे. आरोपी मुकेशने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे पाठविलेल्या दयेचा अर्ज फेटाळल्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

निर्भया प्रकरणातील चार आरोपींपैकी एक मुकेश आहे. त्याने राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल केली होती. परंतु, राष्ट्रपतींनी त्याची दया याचिका फेटाळून लावली होती. राष्ट्रपतींनी ही याचिका का फेटाळली याचा न्यायिक तपास करण्यात यावा, अशी मागणी करीत मुकेशने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

मुकेशचे वकील अंजना प्रकाश यांनी काल (२८ जानेवारी) ही याचिका दाखल केली होती. राष्ट्रपती यांच्याकडे संपूर्ण कागदपत्रे समोर ठेवण्यात आली नाही. दया याचिका फेटाळण्यात राष्ट्रपतींनी घाई करण्यात आली, असा दावा मुकेशने याचिकेतून करण्यात आला होता. मुकेशच्या याचिकेवर आज (२९ जानेवारी) सुनावणीदरम्यान न्यायालयाचे त्यांची याचिका फेटाळली.

१६ डिसेंबरची ‘ती’काळरात्र

१६ डिसेंबर २०१२च्या रात्री पॅरामेडिकलची विद्यार्थीनी निर्भया आणि तिचा मित्र दिल्लीतील एका मॉलमधून सिनेमा पाहून घरी परतत होते. मित्रासोबत खासगी बसमधून मुनिरकाहून द्वारकाला जात होती. बसमध्ये त्या दोघांशिवाय सहा जण होते. त्या बसमध्ये आधीपासूनच चालकासह सहा जण होते. बस सुरु झाल्यावर त्या सहा जणांनी निर्भयाोसबत छेडछाड करायला सुरुवात केली. त्यावेळी तिच्या मित्राने त्यांना विरोध केला. मात्र, आरोपींनी मित्राला बेदम मारहाण केली. त्यामुळे तो बेशुद्ध झाला. त्यानंतर या सहा जणांनी निर्भयावर बसमध्येच बलात्कार केला. तसेच तिला अमानुष मारहाणही केली. त्यामुळे ती गंभीररित्या जखमी झाली होती.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“सुशांत सिंग प्रकरणात आदित्य ठाकरेंना बदनामी करण्याचा राणेंचा प्रयत्न,” केसरकरांचा गंभीर आरोप

Aprna

तुरीपासून डाळ बनवण्याच्या प्रक्रियेत झालेला 2500 हजार कोटी रुपयांचा घोटाळा

Adil

शरद पवार हेच शेतकऱ्यांचे कैवारी आहेत, लक्षात घ्या | अजित पवार

News Desk