HW News Marathi
Uncategorized

#Vidhansabha2019 | राज्यात युतीकडून रिपाईला ‘या’ ६ जागा

मुंबई | आगामी विधानसभेकरिता राज्यातील भाजप-शिवसेना महायुतीकडून रिपब्लिक पक्षाला ६ जागा सोडण्यात आल्याची माहिती मिळत आहे. रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली आहे. सातारा जिल्ह्यातील फलटण, सोलापूरमधील माळशिरस, विदर्भातील भंडारा, मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील नायगाव, परभणी जिल्ह्यातील पाथरी आणि मुंबईतील मानखुर्द शिवाजीनगर या ६ जागा रिपाईला सोडण्यात आल्याची माहिती रामदास आठवले यांनी दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भाजप-शिवसेनेच्या जागावाटपाची अधिकृत घोषणा झाली नसल्याने घटक पक्षांमध्ये देखील संभ्रम होता.

रामदास आठवले यांनी ६ जागांपैकी ४ जागांवरील उमेदवारांच्या नावाची घोषणा देखील केली आहे. मुंबईतील मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून रिपाईचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे, फलटणमधून दिपक निकाळजे, पाथरीमधून आमदार मोहन फड तर नायगावमधून राजेश पवार यांना रिपाईकडून उमेदवारी देण्यात आल्याची माहिती रामदास आठवले यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे, या ६ जागांपैकी उरलेल्या माळशिरस, भंडारा या २ मतदारसंघातील उमेदवारांची नावे लवकरच जाहीर करण्यात येतील असेही रामदास आठवले यांनी यावेळी सांगितले.

आरपीआयच्या ४ उमेदवारांची नावे

  • मानखुर्द शिवाजी नगर – गौतम सोनवणे
  • फलटण – दिपक निकाळजे
  • पाथरी – मोहन फड ( आमदार )
  • नायगाव – राजेश पवार
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हिंदूत्वाची व्याख्या संघाने बदलली

News Desk

शरद पवार हेच शेतकऱ्यांचे कैवारी आहेत, लक्षात घ्या | अजित पवार

News Desk

पूनम राऊतने दिला ‘सुद्धृढ पाय, सुद्धृढ भारत’चा नारा

News Desk