HW News Marathi
Uncategorized

गुजरातमध्ये व्हीव्हीपीटी मशिन फेल

अहमदाबाद(वृत्तसंस्था):गुजरात निवडणुकांमध्ये महत्वाची भूमिका बजावत असलेला पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल सातत्याने भारतीय जनता पार्टीवर हल्लाबोल करत आहे येथील विधानसभा निवडणुकीत वापर होण्यासाठी आणलेल्या मतदान पावती यंत्रांतील (व्हीव्हीपीएटी) तब्बल साडेतीन हजार पावती यंत्रे सदोष निघाली आहेत. निवडणूक आयोगाने ती यंत्रे नाकारली आहेत.

या मुद्यावरून हार्दिक पटेलने भाजप सरकारवर टीका केली आहे. शुक्रवारी ट्विटरद्वारे हार्दिक पटेलने टीका केली. गेल्या २२ वर्षांमध्ये झालेल्या कोणत्याही आंदोलनाच्या मागण्या भाजपा सरकारने कधीच मान्य केल्या नाहीत. निवडणूक आयोगाने घेतलेल्या पहिल्या चाचणीत साडेतीन हजार मशीन फेल झाल्या आहेत. आता भाजपा निवडणुकांमध्ये गोलमाल करूनच लढेल असा माझा दावा आहे असं ट्विट त्याने केलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

ऐतिहासिक स्मारकांच्या विकासासाठी नियोजन समितीच्या निधीतून तरतूद! – सुधीर मुनगंटीवार

Aprna

“मवाळपणा माझ्या रक्तात नाही” – नारायण राणे

News Desk

मोबाइलवर 24 तास गेम खेळल्याने आले अंधत्व

News Desk
Uncategorized

भगवा दहशतवाद देशात सक्रीय

News Desk

चेन्नई – कमल हसन हे दक्षिणेतले अमिताभ…ते सध्या अभिनयातून राजकारणात येवू पहात आहेत. त्या पार्श्वभूमिवर त्यांनी हिंदू दहशतवादावर केलेलं भाष्य बोलकं आहे. त्यांच्या या भाष्यानं खळबळ उडाली आहे.

उजव्या विचारसरणीच्या लोकांनी बळाचा वापर करायला सुरुवात केली आहे. हे लोक हिंसाचारात सहभागी असून हिंदुत्ववादी संघटनांमध्ये दहशतवाद घुसला आहे’, असा थेट आरोप कमल हसन यांनी केला आहे.

तामिळ भाषेतील साप्ताहिकात कमल हसन यांनी हा स्फोटक लेख लिहिला आहे. ‘हिंदू दहशतवाद अस्तित्वात नाही, असं कोणीच म्हणणार नाही. यापूर्वी हिंदुत्ववादी चर्चा करण्यावर विश्वास ठेवायचे. पण आता ते हिंसाचारातही सहभागी होऊ लागले आहेत’, असं सांगतानाच ‘जनतेचा सत्यमेव जयते’वरील विश्वास उडाला आहे’, असंही त्यांनी लेखात म्हटलं आहे. ‘तामिळनाडूच्या तुलनेत केरळ सरकारने धार्मिक हिंसाचार चांगल्या पद्धतीनं हाताळला आहे’, असं सांगत त्यांनी केरळ सरकारचं कौतुकही केलं आहे.

कमल हसन यांच्या या लेखावर तामिळनाडूत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी हसन यांना अत्यंत कठोर शब्दांत लक्ष्य केलं आहे. ‘कमल हसन हे नैतिकदृष्ट्या भ्रष्ट आहेत. हिंदू दहशतवादा’चा कोणताही पुरावा नाही,’ असं स्वामी यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता नवा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Related posts

फोन टॅपिंग मानसिक विकृती, आव्हाडांचा भाजपवर निशाणा

swarit

केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना मातृशोक

News Desk

मुंबईत टीबीने रोज मरतात १८ जण; महिला सर्वाधिक

News Desk