HW News Marathi
Uncategorized

मुंबई विद्यापीठाचे निकाल पाच दिवसांत लावतो

अतुल चव्हाण

मुंबईः मुंबई विद्यापीठातील तृतीय वर्षाचे रखडलेले निकाल येत्या पाच दिवसांत लावतो, असे आश्वासन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले आहे. दरम्यान, निकालाला दिरंगाई का झाली, याबाबत बोलणे त्यांनी टाळले.

राज्यपाल विद्यासागर राव यांनी विद्यापीठातील निकाल ३१ जुलै पूर्वी लागले पाहिजेत, असे निर्देश दिले होते. मात्र, ही मुदत जवळ आलेली असतानाही उत्तरपत्रिका तपासण्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. मुंबई विद्यापीठात निकाल लागण्यास उशीर झाल्याचा मुद्दा शिवसेनेने परिषदेत उचलून धरला. याबाबत विधानसभेत बोलताना विनोद तावडे म्हणाले,की मुंबई विद्यापीठातील कला व वाणिज्य शाखेच्या ३ लाख ७५ हजार, ‘लॉ’च्या सुमारे ४० हजार उत्तर पत्रिका तपासायच्या आहेत. व्यस्थापन विद्याशाखेच्या २८ हजार उत्तर पत्रिका तपासणे बाकी आहे. लॉ, वाणिज्य व व्यवस्थापनविषयाच्या उत्तरपत्रिका तपासणे जिकरीचे झाल्याची त्यांनी कबुली दिली. एकाही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, यासाठी काम करण्यात येत असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज ठाकरेंनी देशपांडे, सरदेसाईंना का पुढे आणलं नाही?, शिवसेनेचा सवाल

Aprna

भीम टायगर सेनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

News Desk

महिन्याभरापासून क्रुझवर अडकलेल्या भारतीय खलाशी,कर्मचाऱ्यांचा मार्ग मोकळा

News Desk