HW News Marathi
मुंबई राजकारण

मुरजी पटेल यांच्या उमेदवारी अर्जावर ठाकरे गटाचा आक्षेप

मुंबई | अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक जाहीर झालेली आहे. या पोटनिवडणुकीसाठी भाजप आणि ठाकरे गटाच्या उमेदवारांसह अपक्ष उमेदवारांनी देखील अर्ज दाखल केले आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंधेरीत वातावरण तापलेले आहे. आज (शनिवार, 15 ऑक्टोबर) ठाकरे गटाचे पदाधिकारी संदीप नाईक यांनी पत्रकार परिषदेत भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मुरजी पटेल यांची उमेदवारी रद्द करा अशी मागणीही त्यांनी केली आहे. ठाकरे गटानंतर अपक्ष उमेदवार मिलींद कांबळे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतला. EPFO संदर्भात चिकीची माहिती भरल्याचा आरोप करण्यात आला आहे.

संदीप नाईक यांनी भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांच्यावर प्रामुख्याने पाच आरोप केले आहेत. पाहुयात ते आरोप काय आहेत.

१. २०१७ पासून सहा वर्षाची निवडणूक लढवण्यास बंदी असताना त्यांनी उमेदवारी अर्ज कसा दाखल केला?

२. निवडणूक लढवण्याच्या परवानगीबाबत उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली असताना त्यांनी उमेदवारी अर्ज का दाखल केला?

३. या दोन्ही प्रकाराची माहिती प्रतिज्ञापत्रात देणे बंधनकारक असताना ती लपवण्यात आली.

४. निवडणूक लढवण्यास बंदी असल्याने, त्यांचा मतदान करण्याचा अधिकार देखील काढून घ्यावा.

५. त्यांच्यावर दाखल असणाऱ्या गुन्ह्याची माहिती त्यांनी प्रतिज्ञापत्रात लपवली.

संदीप नाईक यांनी पत्रकार परिषदेत म्हंटलं की ठाकरे गट पटेल यांच्या विरोधात कोर्टात जाणार आहे. दरम्यान, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईतल्या ५०० फुटांपर्यतच्या घरांना करमाफी

News Desk

गेट वे ऑफ इंडिया येथे मुंबईकरांची योगासने

News Desk

अभाविपच्या संघर्षाला यश, उत्तरपत्रिका घोटाळा प्रकरणात चौकशी समितीची घोषणा

News Desk